शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीबाबत आजच खुलासा करा; हायकोर्टाचे राज्यशासनास आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:01 IST

राज्यातील पूल आणि उड्डाण पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यासंदर्भातील जनहित याचिकेत आदेश

ठळक मुद्देमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ साली आलेल्या पुरात वाहून गेला होता. मुदत संपलेल्या टोलनाक्यांमुळे वाहतुकीला अडथळा

औरंगाबाद : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे वरील टोलवसुली बुथवरील वाहतूक कोंडीसंदर्भातऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. झेड.ए. हक आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या सकृदर्शनी तीन मुद्यांवर बुधवारी (दि.२६) राज्य शासनाकडून शपथपत्राद्वारे खुलासा मागविला आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ साली आलेल्या पुरात वाहून गेला होता. या पार्श्वभूमीवर पार्टी-इन-पर्सन सतीश बी. तळेकर यांनी राज्यातील पूल आणि उड्डाण पुलांच्या बांधकामांचे ‘आयआरसी’ नॉर्म्स आणि शासनाच्या विविध अधिसूचनांनुसार परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यासंदर्भात खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिके च्या सुनावणीदरम्यान मंगळवारी (दि.२५) खंडपीठाने शासनाकडून खुलासा मागविला आहे. या जनहित याचिकेवर गुरुवारी (दि.२७) पुढील सुनावणी होणार आहे.

कमी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याच्या उद्देशाने टोलनाक्यांवरील सर्व मार्ग (लेन) चालू न ठेवता मोजकेच मार्ग (लेन) चालू ठेवतात. ज्यामुळे त्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. अशाप्रकारे उपलब्ध असलेले मार्ग बंद ठेवण्याचा कंत्राटदाराला अधिकार आहे काय, ते सर्व मार्ग चालू का ठेवत नाहीत, याबाबत खंडपीठाने शासनाकडून खुलासा मागविला आहे. टोलनाका चालकांना वाहतूक (रस्ता) अडविण्याचा अधिकार नसेल, तर त्यांच्या या बेकायदेशीर कृतीबद्दल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करता येईल काय, अशीही तोंडी विचारणा खंडपीठाने शासनाकडे केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे व उमाकांत औटे, तर शासनातर्फे अतुल काळे काम पाहत आहेत. याचिकेच्या सुनावणीवेळी २७ फेब्रुवारी रोजी सरकारी वकिलांना सहकार्य करण्यासाठी शासनाने एका जबाबदार अधिकाऱ्याला हजर ठेवावे, असे खंडपीठाने निर्देश दिले. 

मुदत संपलेल्या टोलनाक्यांमुळे वाहतुकीला अडथळाज्या टोलनाक्यांची टोलवसुलीची मुदत संपली आहे, अशा नाक्यांची बांधकामे अद्यापही होती तिथेच उभी आहेत. ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत शासनाने काय कारवाई केली आहे, त्याचप्रमाणे राष्टÑीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस-वेवर रात्रीच्या वेळी ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे, टायर फुटल्यामुळे अथवा पंक्चर झाल्यामुळे अथवा अपघातामुळे जड वाहने रस्त्यालगत तशीच पडलेली असतात. ती त्वरित हटविली जात नाहीत. अथवा वाहन उभे असताना परिवहन (आरटीओ)च्या नियमानुसार वाहनावर रेडियम रिफ्लेक्टर लावत नाहीत, त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशी वाहने हटविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची किंवा शासनाची आहे, याबद्दलही खंडपीठाने खुलासा मागविला असून, अपघात टाळण्यासाठी अशी वाहने त्वरित हटविली जातील, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठhighwayमहामार्गtollplazaटोलनाका