शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीबाबत आजच खुलासा करा; हायकोर्टाचे राज्यशासनास आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:01 IST

राज्यातील पूल आणि उड्डाण पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यासंदर्भातील जनहित याचिकेत आदेश

ठळक मुद्देमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ साली आलेल्या पुरात वाहून गेला होता. मुदत संपलेल्या टोलनाक्यांमुळे वाहतुकीला अडथळा

औरंगाबाद : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे वरील टोलवसुली बुथवरील वाहतूक कोंडीसंदर्भातऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. झेड.ए. हक आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या सकृदर्शनी तीन मुद्यांवर बुधवारी (दि.२६) राज्य शासनाकडून शपथपत्राद्वारे खुलासा मागविला आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ साली आलेल्या पुरात वाहून गेला होता. या पार्श्वभूमीवर पार्टी-इन-पर्सन सतीश बी. तळेकर यांनी राज्यातील पूल आणि उड्डाण पुलांच्या बांधकामांचे ‘आयआरसी’ नॉर्म्स आणि शासनाच्या विविध अधिसूचनांनुसार परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यासंदर्भात खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिके च्या सुनावणीदरम्यान मंगळवारी (दि.२५) खंडपीठाने शासनाकडून खुलासा मागविला आहे. या जनहित याचिकेवर गुरुवारी (दि.२७) पुढील सुनावणी होणार आहे.

कमी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याच्या उद्देशाने टोलनाक्यांवरील सर्व मार्ग (लेन) चालू न ठेवता मोजकेच मार्ग (लेन) चालू ठेवतात. ज्यामुळे त्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. अशाप्रकारे उपलब्ध असलेले मार्ग बंद ठेवण्याचा कंत्राटदाराला अधिकार आहे काय, ते सर्व मार्ग चालू का ठेवत नाहीत, याबाबत खंडपीठाने शासनाकडून खुलासा मागविला आहे. टोलनाका चालकांना वाहतूक (रस्ता) अडविण्याचा अधिकार नसेल, तर त्यांच्या या बेकायदेशीर कृतीबद्दल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करता येईल काय, अशीही तोंडी विचारणा खंडपीठाने शासनाकडे केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे व उमाकांत औटे, तर शासनातर्फे अतुल काळे काम पाहत आहेत. याचिकेच्या सुनावणीवेळी २७ फेब्रुवारी रोजी सरकारी वकिलांना सहकार्य करण्यासाठी शासनाने एका जबाबदार अधिकाऱ्याला हजर ठेवावे, असे खंडपीठाने निर्देश दिले. 

मुदत संपलेल्या टोलनाक्यांमुळे वाहतुकीला अडथळाज्या टोलनाक्यांची टोलवसुलीची मुदत संपली आहे, अशा नाक्यांची बांधकामे अद्यापही होती तिथेच उभी आहेत. ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत शासनाने काय कारवाई केली आहे, त्याचप्रमाणे राष्टÑीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस-वेवर रात्रीच्या वेळी ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे, टायर फुटल्यामुळे अथवा पंक्चर झाल्यामुळे अथवा अपघातामुळे जड वाहने रस्त्यालगत तशीच पडलेली असतात. ती त्वरित हटविली जात नाहीत. अथवा वाहन उभे असताना परिवहन (आरटीओ)च्या नियमानुसार वाहनावर रेडियम रिफ्लेक्टर लावत नाहीत, त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशी वाहने हटविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची किंवा शासनाची आहे, याबद्दलही खंडपीठाने खुलासा मागविला असून, अपघात टाळण्यासाठी अशी वाहने त्वरित हटविली जातील, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठhighwayमहामार्गtollplazaटोलनाका