महापालिका शाळांचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला
By Admin | Updated: June 18, 2014 01:35 IST2014-06-18T01:23:04+5:302014-06-18T01:35:43+5:30
औरंगाबाद : महापालिका शाळांतील दहावीचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी ५३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ८०.१६ टक्के इतका निकाल लागला आहे.

महापालिका शाळांचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला
औरंगाबाद : महापालिका शाळांतील दहावीचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी ५३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ८०.१६ टक्के इतका निकाल लागला आहे.
८०-८५ टक्क्यांपर्यंत गुण घेणाऱ्या ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी ए. एम. शेख यांनी सांगितले.
मिटमिटा शाळेचा निकाल १०० टक्के तर शहाबाजार उर्दू शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. दोन शाळांचा निकाल ५० टक्क्यांहून खाली आला आहे.
मनपा शाळेतून ३८३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले. त्यातील ३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २२ विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक, २७ विद्यार्थी ७० टक्क्यांहून, तर ८८ विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. आयुक्तांनी केलेले प्रयत्न, तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासामुळे मनपा शाळांचा टक्का वाढला आहे.
यांना मिळणार बक्षीस...
मिलिंद रामेश्वर दाभाडे ८५ टक्के, शुभम् बाबासाहेब दाभाडे ८१ टक्के, खान आमेर अय्युब ८१ टक्के, शे.फरिना राजमंहमद शेख ८१ टक्के, शे.सुमानिया फेरोज ८०.८० टक्के यांच्यासह आणखी दोन विद्यार्थ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच १६ विद्यार्थ्यांना प्रत्येक ३५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे.
५८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजारांचे बक्षीस २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात
येईल.
उद्या १८ जून रोजी आयुक्तांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, असे शिक्षणाधिकारी शेख यांनी सांगितले.
शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
पालिका शाळांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढला आहे. शाळांचा निकाल चांगला लागल्याबद्दल शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचे फोनवरून अभिनंदन केले. महापालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणखी कशी मजबूत करता येईल, या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.