शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विद्यापीठातील विभागांना पुन्हा शैक्षणिक स्वायत्तता

By योगेश पायघन | Updated: September 22, 2022 18:07 IST

नवे शैक्षणिक धोरण, विद्या परिषदेचा निर्णय, कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांची माहिती

औरंगाबाद: नव्या शैक्षणिक धोरणानुसार पात्र महाविद्यालये, संस्थांना स्वायत्तता घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वत:च्या विभागांपासून सुरुवात केली आहे. विद्यापीठातील सर्व विभागांची स्वायत्तता दोन वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. त्यांना पुन्हा शैक्षणिक स्वायत्तता देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या विद्या परिषदेत घेण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’वर महाविद्यालय प्राचार्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी पत्रकारांना माहीती दिली. यावेळी प्र. कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ यांची उपस्थिती होती. शैक्षणिक स्वायत्तता देण्याचा निर्णय विद्या परिषदेने घेतला. मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी, अभ्यासक्रम तयार करणे तो शिकवणे, परीक्षा घेणे यावर अधिष्ठातांची समिती लक्ष ठेवेल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

विद्यापीठाशी ४८५ महाविद्यालये संलग्न असून, केवळ ‘एमआयटी’ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या स्वायत्त संस्था आहेत. पात्र महाविद्यालये, संस्थांनीही स्वायत्ततेसाठी पुढे यावे. असेही आवाहन त्यांनी केले.

शैक्षणिक श्रेयांक पेढीत विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक- शैक्षणिक श्रेयांक पेढीत विद्यापीठाची नोंदणी झाली आहे. विद्यापीठाने ‘डीजी लाॅकर’मध्ये २ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांच्या पदवीची नोंदणी केली आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड व ‘पीआरएन’ क्रमांकाच्या मदतीने ही नोंदणी सर्व विद्यार्थ्यांनी करावी, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.

चाॅइस बेस क्रेडिट सिस्टिम- विद्यापीठात २०२२-२३मध्ये ४४ अभ्यासक्रमांत श्रेणी श्रेयांक पद्धत (सीबीसीएस) लागू करण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला. त्यामुळे विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर पदवीलाही १०० टक्के ‘सीबीसीएस’ पद्धत लागू करण्यात आली. कुठल्याही शाखेत कोणत्याही भाषेत शिकले तरी मातृभाषेत पेपर देण्याची मुभा यावर्षीपासून देण्यात येणार आहे. ‘स्वयं’अंतर्गत ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी यावर्षी रेकाॅर्डब्रेक २०२२ नोंदणी झाली आहे. त्यामुळे ऐच्छिक विषय विद्यार्थ्यांना शिकता येईल. त्याचे ‘क्रेडिट’ विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणात जमा होतील.

आता ‘अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा’ अन् ‘पीजी डिप्लोमा’- यावर्षी प्रवेश घेतलेल्यात विद्यार्थ्यांना मल्टीपल एन्ट्री, मल्टीपल एक्झिटची सुविधा देण्यात येणार आहे. पदवीचे शिक्षण घेताना पहिल्या वर्षीचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी बाहेर पडणाऱ्यांना अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि तिसऱ्या वर्षी पदवी, तर पदव्युत्तर शिक्षणात पहिल्या वर्षी बाहेर पडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पीजी डिप्लोमा आणि दोन वर्षांनंतर ‘पीजी डिग्री’ देण्यात येईल. त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना आठवडाभरात निर्ममित करू, असे कुलगुरूंनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठ