शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कचऱ्याची जबाबदारी पोलिसांच्या माथ्यावर

By admin | Updated: December 30, 2015 00:47 IST

औरंगाबाद : रस्त्यावर वाळू, विटा, खडी यासारखे बांधकाम साहित्य आणि कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत,

औरंगाबाद : रस्त्यावर वाळू, विटा, खडी यासारखे बांधकाम साहित्य आणि कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे पत्र महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध पोलीस ठाण्यांना दिले आहे.महानगरपालिकेने कॅरिबॅगच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. कॅरिबॅगचे मुख्य विक्रेते आणि व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यासोबतच आता रस्त्यावर कचरा टाकून रस्ते घाण करणारे तसेच रस्त्यावर वाळू, खडी व बांधकाम साहित्य टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्धही कारवाईचा निर्णय मनपाने घेतला आहे. अशा नागरिकांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे पत्रच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. शहरात रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक ते पैठणगेट, रेल्वेस्टेशन ते घाटी हॉस्पिटल, छावणी ते विद्यापीठगेट ते हर्सूल टी-पॉइंट ते सिडको बसस्थानक, केम्ब्रिज शाळा ते महावीर चौक, सिडको बसस्थानक ते रोशनगेट, आझाद चौक, टी.व्ही. सेंटर ते एन-६, सेव्हन हिल ते गारखेडा शिवाजीनगर आदी प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, चहाचे कप, ओला, सुका कचरा, रेती, खडी रस्त्यावर टाकून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला जात आहे. नागरिक, व्यापारी, मांस विक्रेते रस्त्यावर कचरा टाकत आहेत. अशा व्यक्तींच्या विरोधात मुंबई पोलीस अ‍ॅक्ट व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.