शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 5:33 AM

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे.

औरंगाबाद : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. हक्काच्या पाण्यासाठी मात्र मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधल्याचे ‘लोकमत’ने १९ आॅक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच अखेर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.पत्रकार परिषदेस प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, अतुल सावे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे जिल्ह्यातील आमदार, तसेच जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.आ. बंब म्हणाले, हक्काच्या पाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी २२ आॅक्टोबरला सर्वपक्षीय आमदारांची बैठक होत आहे. प्रत्येक खोऱ्यानुसार किती पाणी आहे, किती पाणी जायकवाडीत आणले पाहिजे, हे ठरविले पाहिजे. समन्यायी पाण्यासंदर्भात कोणाचेही दुमत नाही.>नाक दाबून तोंड उघडता येतेआठवडाभरात हा प्रश्न सुटला नाही तर नाक दाबून तोंड कसे उघडायचे, हे मराठवाड्यातील लोकांना माहीत आहे. आम्ही २२ आॅक्टोबरपर्यंत संयमाने राहू. मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे आ. सत्तार म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण