खचलेल्या पुलाचा अहवाल आज

By Admin | Updated: December 15, 2014 00:50 IST2014-12-15T00:43:09+5:302014-12-15T00:50:52+5:30

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी अचानक खचलेल्या गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री पुलाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती.

Report of the bridge being broken today | खचलेल्या पुलाचा अहवाल आज

खचलेल्या पुलाचा अहवाल आज

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी अचानक खचलेल्या गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री पुलाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. ही समिती १५ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले.
पुलाशेजारी बेसुमार वाळू उपसा झाल्यामुळे महिनाभरापूर्वी पैठण तालुक्यातील आपेगाव आणि कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा पूल अचानक खचला. पुलाच्या १२३ पैकी ४३ खांबांचे यामध्ये नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून लगेचच या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळू उपशामुळेच पूल खचल्याचा प्राथमिक अहवाल दिला; पण त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुलाचे काम कसे झाले होते, गुणवत्तेचे निकष पाळले होते का, या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नेमली होती.

Web Title: Report of the bridge being broken today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.