बदली आदेशाला कर्मचाऱ्यांचा ‘खो’
By Admin | Updated: June 15, 2015 00:08 IST2015-06-15T00:08:13+5:302015-06-15T00:08:13+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील महसूल विभागात एकाच कार्यालयात पाच वर्ष व एका टेबलवर तीन वर्ष राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी

बदली आदेशाला कर्मचाऱ्यांचा ‘खो’
व्यंकटेश वैष्णव , बीड
जिल्ह्यातील महसूल विभागात एकाच कार्यालयात पाच वर्ष व एका टेबलवर तीन वर्ष राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ३० मे च्या दरम्यान केल्या होत्या. बदली प्रक्रियेला ११ दिवस उलटूनही बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नसून चक्क जिल्हाधिकारी यांच्या बदली आदेशालाच कर्मचाऱ्यांनी ‘खो’ दिला आहे.
महसूल विभागातील तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी यांनी केल्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन ११ दिवसाच्या जवळपास कालावधी लोटला तरी देखील बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नाहीत. चक्क जिल्हाधिकारी यांच्या बदली आदेशाला महसूल कर्मचाऱ्यांनी ‘खो’ दिला असल्याचे चित्र महसूल विभागात पहावयास मिळत आहे.
तृतीय व चतुर्थ श्रेणीतील ८५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर्मचारी बदली प्रकिया ३० मे च्या दरम्यान पूर्ण झाली होती. आता याला आकरा दिवसापेक्षा जास्त दिवस उलटूनही बदली झालेल्या ८५ कर्मचाऱ्यांपैकी २२ ते २५ जण बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष
ज्या महसूल कर्मचाऱ्यांची बदली होऊन आठ दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील ते बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत, अशा कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यांनी बदली पत्र हातात पडल्याच्या दिवसापासून आठ दिवसाच्या आत बदलीच्या ठिकाणी रूजू होणे बंदनकारक आहे. मात्र अद्याप पर्यंत पंचेवीसच्या जवळपास महसूल कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत.
असे आहेत बदलीचे निकष..
४ज्या कर्मचाऱ्याचा एकाच टेबलवर काम करण्याचा कालावधी तीन वर्ष झालेला आहे, अशांना त्याच विभागातील दुसरा टेबल (कामाच्या स्वरूपात बदल) दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना एका कार्यालयात पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालय बदलून बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.