शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

धार्मिक स्थळे : कृती कार्यक्रम सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:49 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याबाबतचा कृती कार्यक्रम महापालिकेने आजच्या सुनावणीच्या वेळी शपथपत्राद्वारे न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठात सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याबाबतचा कृती कार्यक्रम महापालिकेने आजच्या सुनावणीच्या वेळी शपथपत्राद्वारे न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठात सादर केला. १४ आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष कृती सुरूकरून १७ नोव्हेंबरपर्यंत ‘ब’ वर्गातील सार्वजनिक जागेवरील आणि शासकीय जागेवरील धार्मिक स्थळे हटविण्यात येतील, असे शपथपत्रात म्हटले आहे.खंडपीठाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार पुन्हा १८ आॅगस्टपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. सुनावणीपूर्वीच्या ८०३ आणि सुनावणीनंतरच्या नव्याने प्राप्त झालेल्या ५५०, अशा एकूण १३५० हरकतींवर निर्णय घ्यावयास वेळ लागणार आहे. या हरकतींवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊन १४ आॅक्टोबरपर्यंत खाजगी जागेवरील धार्मिक स्थळे यादीतून वगळण्यात येतील. २९ आॅक्टोबरपर्यंत सार्वजनिक आणि शासकीय जागेवरील धार्मिक स्थळांची यादी अंतिम करण्यात येईल. १९६० पूर्वीची ‘ब’ वर्गातील अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची परवानगी राज्यस्तरीय समितीकडून घेण्यात येईल. त्यानंतर १७ नोव्हेंबरपर्यंत ‘ब’ वर्गातील सार्वजनिक जागेवरील आणि शासकीय जागेवरील धार्मिक स्थळे हटविण्यात येतील, असा कृती कार्यक्रम मनपाने सादर केला.धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात मनपास्तरावरील समितीच्या ११ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत समितीचे सदस्य पोलीस आयुक्तांऐवजी पोलीस निरीक्षक आणि जिल्हाधिकाºयांऐवजी नायब तहसीलदार हजर होते. त्यामुळे ती बैठक झाली नाही. याबाबत राज्याचे मुख्य सचिव तसेच गृह आणि शहर विकास खात्याचे प्रधान सचिव यांना कळविण्यात आल्याचे सकाळच्या सुनावणीदरम्यान मनपातर्फे सांगण्यात आले. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त करून पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांना दुपारच्या सुनावणीच्या वेळी व्यक्तिश: हजर राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार वरील दोन्ही अधिकारी दुपारी खंडपीठात हजर झाले. त्यांनी खंडपीठाची विनाअट माफी मागून अपवादात्मक परिस्थिती वगळता प्रत्येक बैठकीस न चुकता हजर राहू, अशी हमी दिली. न झालेली ११ आॅगस्टची बैठक २१ आॅगस्ट रोजी होणार असल्याचे मनपातर्फे निवेदन करण्यात आले. धार्मिक स्थळांसंदर्भातील याचिकांवर २३ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाचे मित्र अ‍ॅड. प्रदीप देशमुख, इतर याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे व व्ही. जे. दीक्षित, अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अ‍ॅड. सुजित जोशी, अ‍ॅड. एस. के. कय्युम नाझीर, अ‍ॅड. श्रीकृष्ण सोळंके, अ‍ॅड. संदीप राजेभोसले, अ‍ॅड. सुशांत दीक्षित व अ‍ॅड. विक्रम धोर्डे काम पाहत आहेत.