शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

डोक्यावरचा बोजा उतरला; ४१०५ शेतकऱ्यांचा सातबारा २५ वर्षांनंतर होणार कोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:56 IST

भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा

छत्रपती संभाजीनगर : भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी मार्चमध्ये झाल्याने जिल्ह्यातील ४ हजार१०५ शेतकऱ्यांचा सातबारा सुमारे २५ वर्षांनंतर कोरा होण्यास सुरुवात झाली आहे. सहकार विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या.

औरंगाबाद जिल्हा भूविकास बँक ही केवळ शेतकऱ्यांनाच दीर्घ आणि मुदतीचे कर्ज देणारी सहकारी बँक होती. ही बँक ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक मोटारपंप खरेदीसाठी आणि पाइपलाइन टाकण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देत होती. कर्ज देताना शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कर्जाची नोंद केली जात होती. राज्य सहकारी भूविकास बँकेच्या कर्जाला राज्यशासनाची गॅरंटी असायची. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भूविकास बँकेला कर्ज उपलब्ध होत होते. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नव्हती. यामुळे वसुली न झाल्याने भूविकास बँकेला कर्जवाटप करता आले नाही. शिवाय राज्य सरकारनेही बँकेला कर्ज देताना दरवर्षीप्रमाणे गॅरंटी घेण्यास नकार दिल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले. 

जिल्ह्यातील ४ हजार १०५ शेतकऱ्यांकडे व्याजासह १२८ कोटी ४९लाख रुपयांची थकबाकी होती. ही रक्कम वसूल होत नव्हती. अशीच परिस्थिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील भूविकास बँकेची होती. भूविकास बँकेची कर्जाची थकबाकी असल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा असल्याने त्यांना शेतीची वाटणी करणे अथवा विक्रीही करता येत नव्हती. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गतवर्षी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४१०५ शेतकऱ्यांचे कर्जखाते बेबाक करण्याची प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत बँकेने पूर्ण केली. यानंतर बँकेने याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सांगितले.

बँकेकडून बेबाक प्रमाणपत्रकर्जदार शेतकरी क्रांती चौकातील जिल्हा भूविकास बँकेच्या कार्यालयातून बेबाकी प्रमाणपत्र नेत आहेत. या बेबाकी प्रमाणपत्राच्या आधारे ते सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा उतरविण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करू शकतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादbankबँक