शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीने आतापर्यंत घेतले ७ बळी; निष्काळजीपणे वाहतूक कधी थांबणार?

By मुजीब देवणीकर | Updated: October 4, 2023 18:58 IST

वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीला २०१९ मध्ये कंत्राट दिले. मागील चार-पाच वर्षांत कंपनीने तब्बल ७ निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याची माहिती आहे. यातील बहुतांश बळी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे आहेत. वारंवार अपघात होत असतानाही कंपनीकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही, हे विशेष.

रेड्डी कंपनीच्या ३०० रिक्षा कचरा संकलनासाठी ११५ वॉर्डांत नियुक्त केल्या आहेत. घंटागाडीत जमा होणारा कचरा एका मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये टाकण्यात येतो. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येतो. घंटागाड्यांचा कचरा एकत्रित करण्यासाठी शहरात एकूण ९ ठिकाणे निश्चित केली आहेत. २० पेक्षा अधिक कॉम्पॅक्टरद्वारे दररोज ४०० ते ४५० मे. टन कचऱ्याची वाहतूक होते. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांत जास्त कचऱ्याची वाहतूक होते. सायंकाळी ७ नंतर अत्यंत कमी वाहने वापरली जातात.

सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते. अन्य वाहनधारकांची कोणतीही पर्वा न करता ही वाहने अत्यंत निष्काळजीपणे चालविण्यात येतात. त्यातून अनेकदा अपघात झाले आहेत. पण, यातून कंपनीने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येते.

कंत्राटी चालक, पगाराचे वांधेरेड्डी कंपनीने अत्यंत कमी पगारावरील चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना मोठी वाहने चालविण्याचा अनुभव आहे किंवा नाही, हे सुद्धा तपासलेले नाही. पगार कमी असल्याच्या मुद्यावरून कंपनीच्या चालकांनी अनेकदा मनपासमोर आंदोलने केली.

वारंवार सूचना दिल्या जातातखासगी कंपनीच्या वाहनांच्या फिटनेसची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. चालकांनी वाहने सावकाश हळुवारपणे चालवावीत, अशा सूचना मनपाकडून नेहमी देण्यात येतात. मंगळवारी दुपारी झालेला अपघात दुर्दैवी असून, कंपनीला पुन्हा एकदा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सोमनाथ जाधव, उपायुक्त, घनकचरा विभाग.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न