शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीने आतापर्यंत घेतले ७ बळी; निष्काळजीपणे वाहतूक कधी थांबणार?

By मुजीब देवणीकर | Updated: October 4, 2023 18:58 IST

वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीला २०१९ मध्ये कंत्राट दिले. मागील चार-पाच वर्षांत कंपनीने तब्बल ७ निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याची माहिती आहे. यातील बहुतांश बळी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे आहेत. वारंवार अपघात होत असतानाही कंपनीकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही, हे विशेष.

रेड्डी कंपनीच्या ३०० रिक्षा कचरा संकलनासाठी ११५ वॉर्डांत नियुक्त केल्या आहेत. घंटागाडीत जमा होणारा कचरा एका मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये टाकण्यात येतो. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येतो. घंटागाड्यांचा कचरा एकत्रित करण्यासाठी शहरात एकूण ९ ठिकाणे निश्चित केली आहेत. २० पेक्षा अधिक कॉम्पॅक्टरद्वारे दररोज ४०० ते ४५० मे. टन कचऱ्याची वाहतूक होते. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांत जास्त कचऱ्याची वाहतूक होते. सायंकाळी ७ नंतर अत्यंत कमी वाहने वापरली जातात.

सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते. अन्य वाहनधारकांची कोणतीही पर्वा न करता ही वाहने अत्यंत निष्काळजीपणे चालविण्यात येतात. त्यातून अनेकदा अपघात झाले आहेत. पण, यातून कंपनीने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येते.

कंत्राटी चालक, पगाराचे वांधेरेड्डी कंपनीने अत्यंत कमी पगारावरील चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना मोठी वाहने चालविण्याचा अनुभव आहे किंवा नाही, हे सुद्धा तपासलेले नाही. पगार कमी असल्याच्या मुद्यावरून कंपनीच्या चालकांनी अनेकदा मनपासमोर आंदोलने केली.

वारंवार सूचना दिल्या जातातखासगी कंपनीच्या वाहनांच्या फिटनेसची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. चालकांनी वाहने सावकाश हळुवारपणे चालवावीत, अशा सूचना मनपाकडून नेहमी देण्यात येतात. मंगळवारी दुपारी झालेला अपघात दुर्दैवी असून, कंपनीला पुन्हा एकदा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सोमनाथ जाधव, उपायुक्त, घनकचरा विभाग.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न