शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

औरंगाबादमध्ये महावितरणची वसुली जोरात; २३ दिवसांत ३६ कोटी जमा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:50 IST

महावितरणने १ मार्चपासून शहर व परिमंडळांतर्गत वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविली.

औरंगाबाद : महावितरणने १ मार्चपासून शहर व परिमंडळांतर्गत वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविली. अवघ्या २३ दिवसांत अधिकारी-कर्मचारी आणि अभियंत्यांनी शहरातील ग्राहकांकडून ३६ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी वसूल केली, हे विशेष!

३१ मार्चपर्यंत ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असली, तरी ही धडक मोहीम वर्षभर चालूच ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी शनिवारी शहर मंडळ तसेच ग्रामीण मंडळांतर्गत सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी अभियंत्यांची व वित्त व लेखा विभागातील अधिकार्‍यांना बैठकीत दिले.

एक मार्चपासून औरंगाबाद शहरात वीज ग्राहकांकडून ३६ कोटी ३० लाख रुपये एवढी थकबाकी वसूल करण्यात आली. येत्या ७ दिवसांत १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत पॉवर हाऊस उपविभागाने ४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली. या उपविभागाला आता १ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. शहागंज उपविभागाने ६ कोटी वसूल केले. आता ४ कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. छावणी उपविभागाने ८ कोटी रुपयांची थकबाकी वसुली केली असून, आता उर्वरित ४ कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. वाळूज उपविभागाला ६५ लाख थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. चिकलठाणा उपविभागात ६ कोटी ५० लाखांची थकबाकी वसुली झाली असून, या उपविभागासमोर आता २ कोटींच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट आहे. सिडको उपविभागाने ३ कोटी थकबाकी वसुली केली असून, १ कोटी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

क्रांतीचौक उपविभागात ४ कोटी ३० लाख थकबाकी वसुली केली असून, या उपविभागाला १ कोटी ५० लाख थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. गारखेडा उपविभागाने ४ कोटी ५० लाख थकबाकी वसुली केली असून, २ कोटी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.या बैठकीत अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, रतन सोनुले, प्रणाली विश्लेषक दिलीप मालखेडे, प्रकाश चांडगे, कार्यकारी अभियंता रेखा कुलकर्णी, पवनकुमार कछोट, अभिजित सिकणीस, सिद्धार्थ जाधव, योगेश निकम, नामदेव गांधले, राम काळे, प्रेमसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी, अभियंते, व्यवस्थापक (वित्त व लेखा) व अन्य अधिकारी-अभियंते उपस्थित होते.

कामचुकारांविरुद्ध कारवाईचा इशाराऔरंगाबाद ग्रामीण मंडळांसमोर १५ कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पैठण उपविभागाला २ कोटी, औरंगाबाद ग्रामीण उपविभाग एकसाठी १ कोटी ७० लाख, औरंगाबाद ग्रामीण उपविभाग दोनसाठी २ कोटी, गंगापूर उपविभागाला २ कोटी ५० लाख, खुलताबाद उपविभागाला ७० लाख, फुलंब्री उपविभागाला ८० लाख.

कन्नड उपविभागाला १ कोटी ५० लाख, सिल्लोड उपविभागाला २ कोटी, पिशोर उपविभागाला ५० लाख, वैजापूर उपविभागाला १ कोटी २० लाख, सोयगाव उपविभागाला ५० लाख रुपयांच्या थकबाकीचे उद्दिष्ट देण्यात आले. ३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍या अभियंत्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी