शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

वसुुली तळाला; प्रशासनाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:10 AM

महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता वसुली मोठ्या प्रमाणात व्हावी यादृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, प्रशासनाला किंचितही यश आले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता वसुली मोठ्या प्रमाणात व्हावी यादृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, प्रशासनाला किंचितही यश आले नाही. एप्रिल २०१८ पासून वसुली अत्यंत नाममात्र होत असल्याने प्रशासनाची चिंता बरीच वाढली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही वांधे होत आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत लक्ष घातले असून, वसुली कर्मचाºयांना तुम्हीच आयुक्त समजून वसुली करा, असा आदेश दिला.दोन दिवसांपूर्वीच डॉ. निपुण विनायक यांनी संशोधन केंद्रात मालमत्ता विभागाची बैठक घेतली. सर्व वॉर्ड अधिकारी, वसुली कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते. तब्बल दोन ते अडीच तास ही बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्तांनी वसुली का होत नाही, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्मचाºयांना विश्वासात घेऊन वसुली कशी वाढेल, वसुली करताना कोणत्या अडचणी येतात. नागरिक सहकार्य का करीत नाहीत. वसुलीसाठी गेल्यावर नागरिकांचा नेमका रोष काय असतो. याविषयी कर्मचा-यांची मते जाणून घेतली.महापालिकेत रुजू होण्यापूर्वी मुंबई ते औरंगाबाद प्रवासात त्यांनी ज्या पद्धतीने प्रवाशांकडून शहर कसे असावे याबाबतीत प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. त्याच पद्धतीने वसुली कर्मचा-यांकडून छोट्या कागदावर समस्या आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात याची लेखी माहिती घेतली. यानंतर आयुक्त आता कोणता ठोस निर्णय घेतात याकडे संपूर्ण मनपाचे लक्ष लागले आहे. मालमत्ता कराची २३० कोटी रुपये थकबाकी आहे. या थकबाकीवरील ७५ टक्के व्याज आणि दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्यासाठी मनपाने अभय योजना सुरू केली. या योजनेकडेही औरंगाबादकरांनी पाठ फिरविली. ३१ मे रोजी योजना संपत आहे. या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय पदाधिकरी व प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर