शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात टोमॅटो १५० रुपये किलो; शेतकऱ्याच्या हातात पडतात फक्त ७५ रुपयेच

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 7, 2023 12:45 IST

भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला.

छत्रपती संभाजीनगर : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत १५० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटो महाग झाले असले तरी पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जात असल्याने सर्वसामान्य ग्राहक शांत बसला आहे. पण वास्तव तसे दिसत नाही, दीडशे रुपयांना जरी टोमॅटो विकले जात असले तरी उत्पादकांच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. बाकीची रक्कम वितरण प्रणालीच्या गल्ल्यात जमा होत आहे.

शहरातील भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला. यामुळे सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. नुसते टोमॅटो नाही तर अन्य भाज्याही ८० ते १०० रुपये किलो दरम्यान विकत आहेत. टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने व मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. असे असले तरी झालेली भाववाढ ही सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. मात्र, टोमॅटो उत्पादकांना किलोमागे १०० ते १३० रुपये मिळत असतील, अशी धारणा ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा याबाबत शेतकऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा वेगळेच चित्र समोर आले. बाजारात जरी १५० रुपये भाव असला तरी किलोमागे ७० ते ७५ रुपये मिळत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. यामुळे या टंचाईचा फायदा कोण उचलते, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेतकऱ्याच्या नावावर दलाल करतात कमाईमी पाच एकरवर टोमॅटो लावले. मे महिन्यात प्रतिकॅरेट (२५ किलो) ४० ते ५० रुपयांना विकावे लागले. भाववाढीचा काय फायदा. बाजारात १५० रुपये जरी विकत असले तरी उत्पादकाच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. पिकविणाऱ्यांना पैसे मिळत नाही आणि खाणाऱ्यांना स्वस्त मिळत नाही, अशी अवस्था असून मधले दलालच मलाई खात आहेत.- वाल्मीक शिरसे टोमॅटो उत्पादक (बहिरगाव,ता.कन्नड)

भाव वाढले पण शेतकऱ्याला नाही फायदानवीन टोमॅटो ऑगस्ट महिन्यात येतील. सध्या टोमॅटोची टंचाई आहे. आमच्याकडेही टोमॅटो नाही. एप्रिल- मे महिन्यात मातीमोल भावात टोमॅटो विकल्या गेले. आता भाव वाढला आहे. मात्र, शेतात टोमॅटो नसल्याने या भाववाढीचा उत्पादकांना काय फायदा. जेव्हा आमच्याकडे टोमॅटो येतील तेव्हा भाव पडतील. हेच तर शेतकऱ्याचे दुखणे आहे.- संजय दांडगे शेतकरी (वरुड काझी)

भाव वाढूनही शेतकऱ्याचे उत्पन्न कमीच१० टन टोमॅटो होते तेव्हा १० रुपये किलोने विकल्या जात होते. आता १ टन टोमॅटो आहे तर त्यास १५० रुपये किलो भाव मिळत आहे. जेव्हा समाधानकारक उत्पादन होते तेव्हा टोमॅटोला एवढा भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता २०० रुपये भाव झाला तरी उत्पादनच कमी असल्यावर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत नाही.- भगवान कापसे कृषितज्ज्ञ

जाधववाडीत टोमॅटोची ६४ क्विंटलच आवकजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फक्त ५० ते ६४ क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. यात कन्नड तालुक्यातून व श्रीरामपूरमधून टोमॅटो येत आहे. गुरुवारी ३७०० ते १६००० रुपये प्रतिक्विंटल भाव टोमॅटोला मिळाल्याची माहिती कृउबा समितीने दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या