शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बाजारात टोमॅटो १५० रुपये किलो; शेतकऱ्याच्या हातात पडतात फक्त ७५ रुपयेच

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 7, 2023 12:45 IST

भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला.

छत्रपती संभाजीनगर : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत १५० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटो महाग झाले असले तरी पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जात असल्याने सर्वसामान्य ग्राहक शांत बसला आहे. पण वास्तव तसे दिसत नाही, दीडशे रुपयांना जरी टोमॅटो विकले जात असले तरी उत्पादकांच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. बाकीची रक्कम वितरण प्रणालीच्या गल्ल्यात जमा होत आहे.

शहरातील भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला. यामुळे सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. नुसते टोमॅटो नाही तर अन्य भाज्याही ८० ते १०० रुपये किलो दरम्यान विकत आहेत. टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने व मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. असे असले तरी झालेली भाववाढ ही सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. मात्र, टोमॅटो उत्पादकांना किलोमागे १०० ते १३० रुपये मिळत असतील, अशी धारणा ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा याबाबत शेतकऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा वेगळेच चित्र समोर आले. बाजारात जरी १५० रुपये भाव असला तरी किलोमागे ७० ते ७५ रुपये मिळत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. यामुळे या टंचाईचा फायदा कोण उचलते, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेतकऱ्याच्या नावावर दलाल करतात कमाईमी पाच एकरवर टोमॅटो लावले. मे महिन्यात प्रतिकॅरेट (२५ किलो) ४० ते ५० रुपयांना विकावे लागले. भाववाढीचा काय फायदा. बाजारात १५० रुपये जरी विकत असले तरी उत्पादकाच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. पिकविणाऱ्यांना पैसे मिळत नाही आणि खाणाऱ्यांना स्वस्त मिळत नाही, अशी अवस्था असून मधले दलालच मलाई खात आहेत.- वाल्मीक शिरसे टोमॅटो उत्पादक (बहिरगाव,ता.कन्नड)

भाव वाढले पण शेतकऱ्याला नाही फायदानवीन टोमॅटो ऑगस्ट महिन्यात येतील. सध्या टोमॅटोची टंचाई आहे. आमच्याकडेही टोमॅटो नाही. एप्रिल- मे महिन्यात मातीमोल भावात टोमॅटो विकल्या गेले. आता भाव वाढला आहे. मात्र, शेतात टोमॅटो नसल्याने या भाववाढीचा उत्पादकांना काय फायदा. जेव्हा आमच्याकडे टोमॅटो येतील तेव्हा भाव पडतील. हेच तर शेतकऱ्याचे दुखणे आहे.- संजय दांडगे शेतकरी (वरुड काझी)

भाव वाढूनही शेतकऱ्याचे उत्पन्न कमीच१० टन टोमॅटो होते तेव्हा १० रुपये किलोने विकल्या जात होते. आता १ टन टोमॅटो आहे तर त्यास १५० रुपये किलो भाव मिळत आहे. जेव्हा समाधानकारक उत्पादन होते तेव्हा टोमॅटोला एवढा भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता २०० रुपये भाव झाला तरी उत्पादनच कमी असल्यावर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत नाही.- भगवान कापसे कृषितज्ज्ञ

जाधववाडीत टोमॅटोची ६४ क्विंटलच आवकजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फक्त ५० ते ६४ क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. यात कन्नड तालुक्यातून व श्रीरामपूरमधून टोमॅटो येत आहे. गुरुवारी ३७०० ते १६००० रुपये प्रतिक्विंटल भाव टोमॅटोला मिळाल्याची माहिती कृउबा समितीने दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या