शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बीड बायपाससाठी चार निविदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 14:00 IST

विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देअजिंठा रस्त्याचे काम बंदच कंत्राटदाराने पोबारा केल्याने सहा महिन्यांपासून ठप्प पडले काम

औरंगाबाद : बीड बायपासचे काम ३८३ कोटी रुपयांतून करण्यात येणार आहे. यात रुंदीकरणासह उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविलेल्या निविदांना चार परप्रांतीय कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. 

औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे काम आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीने घेतले होते. तो कंत्राटदार अवसायनात निघाल्यामुळे त्याने पोबारा केला. रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यामुळे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या राज्य विभागाला नव्याने कंत्राटदार शोधून ते काम सुरू करण्यासाठी धावपळ करावी लागली.हा सगळा प्रकार सहा महिन्यांपासून सुरू असताना बांधकाम विभागाने मागविलेल्या ३८३ कोटींच्या निविदांना बाहेरच्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे या कामाचेही औरंगाबाद-सिल्लोड या रस्त्याच्या कामासारखे होणार नाही, याची हमी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

३८३ कोटींतून करणार काय?३८३ कोटींतून १४ कि़मी. रस्त्यांचे कोणते काम करणार, किती उड्डाणपूल बांधणार. भुयारी मार्गांचा काही समावेश आहे काय? शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल बांधणार की नाही. देवळाई चौकातील वाहतूक कोंडी आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाबाबत तांत्रिकदृष्ट्या काय उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्या बाबींचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मध्ये काही विचार केला आहे की नाही. याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर आणलेली नाही. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ३७९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून दिल्लीतील मुख्यालयाला पाठविला होता. परंतु त्याबाबत आजवर काहीही निर्णय झाला नाही. बायपास हस्तांतरित करण्यावरून कायदेशीर बाबी पुढे आणल्याने तो डीपीआर रद्द झाल्यात जमा आहे. त्या डीपीआरमध्ये तीन उड्डाणपूल व रुंदीकरणासह इतर कामांचा समावेश होता. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा