शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

बीड बायपाससाठी चार निविदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 14:00 IST

विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देअजिंठा रस्त्याचे काम बंदच कंत्राटदाराने पोबारा केल्याने सहा महिन्यांपासून ठप्प पडले काम

औरंगाबाद : बीड बायपासचे काम ३८३ कोटी रुपयांतून करण्यात येणार आहे. यात रुंदीकरणासह उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविलेल्या निविदांना चार परप्रांतीय कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. 

औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे काम आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीने घेतले होते. तो कंत्राटदार अवसायनात निघाल्यामुळे त्याने पोबारा केला. रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यामुळे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या राज्य विभागाला नव्याने कंत्राटदार शोधून ते काम सुरू करण्यासाठी धावपळ करावी लागली.हा सगळा प्रकार सहा महिन्यांपासून सुरू असताना बांधकाम विभागाने मागविलेल्या ३८३ कोटींच्या निविदांना बाहेरच्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे या कामाचेही औरंगाबाद-सिल्लोड या रस्त्याच्या कामासारखे होणार नाही, याची हमी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

३८३ कोटींतून करणार काय?३८३ कोटींतून १४ कि़मी. रस्त्यांचे कोणते काम करणार, किती उड्डाणपूल बांधणार. भुयारी मार्गांचा काही समावेश आहे काय? शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल बांधणार की नाही. देवळाई चौकातील वाहतूक कोंडी आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाबाबत तांत्रिकदृष्ट्या काय उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्या बाबींचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मध्ये काही विचार केला आहे की नाही. याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर आणलेली नाही. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ३७९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून दिल्लीतील मुख्यालयाला पाठविला होता. परंतु त्याबाबत आजवर काहीही निर्णय झाला नाही. बायपास हस्तांतरित करण्यावरून कायदेशीर बाबी पुढे आणल्याने तो डीपीआर रद्द झाल्यात जमा आहे. त्या डीपीआरमध्ये तीन उड्डाणपूल व रुंदीकरणासह इतर कामांचा समावेश होता. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा