शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

रखडलेल्या कामांचे मनपाकडून पुनर्विलोकन

By admin | Updated: December 18, 2015 00:16 IST

औरंगाबाद : मंजुरीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आतापर्यंत सुरुवात न झालेल्या विकासकामांचे आता महानगरपालिकेकडून पुनर्विलोकन होणार आहे.

औरंगाबाद : मंजुरीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आतापर्यंत सुरुवात न झालेल्या विकासकामांचे आता महानगरपालिकेकडून पुनर्विलोकन होणार आहे. प्रभारी आयुक्तांनी अशा सर्व कामांची यादी तात्काळ सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यादीच्या छाननीनंतर अत्यावश्यक वाटतील तेवढीच कामे कायम ठेवली जाणार असून, उर्वरित कामांना मात्र फाटा दिला जाणार आहे. त्यामुळे सुमारे २० कोटी रुपयांची कामे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. महानगरपालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली जातात; परंतु गेल्या काही वर्षांत पालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सर्वच कामांना निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी काही मंजूर कामे तशीच राहतात. अशा कामांची संख्या खूप आहे. आता या कामांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मंजूर तरतुदीत ही कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे या कामांचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्तांनी घेतला आहे. त्याबाबत आयुक्तांनी सर्व विभागांकडून सुरू न झालेल्या मंजूर कामांची यादी मागविली आहे. ज्या कामांना मंजुरी मिळून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे; परंतु त्यांना आतापर्यंत सुरुवातही झालेली नाही अशाच कामांची यादी सादर करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या कामाचा खर्च खूपच वाढलेला असेल आणि आजच्या परिस्थितीत त्या कामावर तेवढा खर्च करणे परवडणारे नसेल तर तशी कामेही रद्द करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सद्य:स्थितीत मंजूर कामांपैकी एकूण ७० कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणे बाकी आहे. त्यातील किमान २० कोटी रुपयांची कामे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.