शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 17:57 IST

आम्ही मुखवटा लावून फिरत नाही,ज्यांच्यावर डोळेझाकून विश्वास टाकला त्यांनी गद्दारी केली 

औरंगाबाद: गद्दारांना जनता कधीच माफ करत नाही. ज्याला जिथे राहायचे आहे तिथे आनदाने रहा. फक्त बंडखोर आमदारांनी हिम्मत करून राजीनामा द्यावा. जनता जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल, असे खुले आव्हान युवासेना प्रमुख , माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. 

अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. आज दुपारी नाशिक येथून आदित्य ठाकरे यांचे औरंगाबाद जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य यांनी शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हे सरकार बेकादेशीर असल्याचा आरोप करत आदित्य यांनी सेनेतील बंडखोरांनी हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे असे थेट आव्हान दिले. जे जनता ठरवले ते आम्हाला मान्य आहे. ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी कायम दरवाजे उघडे आहेत, असेही आदित्य म्हणाले. 

शिवसैनिक आणि राज्यातील जनता आमच्यासोबतज्या लोकांनी गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्ही खूप दिले. एकच चूक ठरली, आम्ही त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला. वर्षा बंगल्यातून निघताना अनेक आमदार हात धरून रडले. त्यांनी नंतर गद्दारी केली. त्यांची नावे घेऊ इच्छित नाही. एवढा खोटेपणा आमच्यात नाही. आम्ही मुखवटे लावून फिरत नाही. त्यांना आम्ही काय दिले, त्यांनी कोणती पदे उपभोगली, सरकार म्हणून आम्ही केलेले काम जनतेसमोर आहे. शिवसेना, मूळ शिवसैनिक आणि राज्यातील जनता आमच्यासोबत आहे, असा ठाम विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना