शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बेरोजगारांना दिलासा ! रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:07 IST

सुमारे ५० हजार ‘टीएआयटी’ पात्र उमेदवारांना दिलासा

ठळक मुद्देरखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार 

औरंगाबाद : पवित्र पोर्टलमार्फत ‘ऑनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील एका अंतरिम आदेशामुळे निकाल रखडला होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी वरील अंतरिम आदेशात दुरुस्ती करून रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश शुक्रवारी (दि.३१) दिला. 

या आदेशामुळे राज्यातील बी. एड. पदवीधारक ‘टीचर्स अ‍ॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५० हजार पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे राज्यातील पवित्र पोर्टलमार्फत ‘आॅनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान होईल. नितीन कचरे या पदवीधारक याचिकाकर्त्याने बी.एड.ला प्रवेश घेतल्यानंतर ‘टीचर्स अ‍ॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) दिली. वास्तविक  ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार बी. एड. पदवीधारक असणे बंधनकारक असताना कचरे यांनी अपूर्ण माहितीआधारे ‘टीएआयटी’ परीक्षा दिली. त्यानंतर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. नोंदणी नाकारल्यामुळे कचरे यांनी अ‍ॅड. शरद नातू मार्फत औरंगाबाद  खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेश देऊन कचरे यांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली. 

३१ जानेवारीला झाला अंतरिम आदेशराज्यातून सुमारे ६५ हजार उमेदवारांनी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता. त्यातील सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले होते. मात्र, खंडपीठाच्या वरील अंतरिम आदेशामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. ३१ जानेवारी २०२० रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेशात दुरुस्ती केल्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या वतीने  सहायक सरकारी वकील अतुल काळे तर हस्तक्षेपकाच्या वतीने अ‍ॅड. दिलीप बनकर पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद