शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बेरोजगारांना दिलासा ! रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:07 IST

सुमारे ५० हजार ‘टीएआयटी’ पात्र उमेदवारांना दिलासा

ठळक मुद्देरखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार 

औरंगाबाद : पवित्र पोर्टलमार्फत ‘ऑनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील एका अंतरिम आदेशामुळे निकाल रखडला होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी वरील अंतरिम आदेशात दुरुस्ती करून रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश शुक्रवारी (दि.३१) दिला. 

या आदेशामुळे राज्यातील बी. एड. पदवीधारक ‘टीचर्स अ‍ॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५० हजार पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे राज्यातील पवित्र पोर्टलमार्फत ‘आॅनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान होईल. नितीन कचरे या पदवीधारक याचिकाकर्त्याने बी.एड.ला प्रवेश घेतल्यानंतर ‘टीचर्स अ‍ॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) दिली. वास्तविक  ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार बी. एड. पदवीधारक असणे बंधनकारक असताना कचरे यांनी अपूर्ण माहितीआधारे ‘टीएआयटी’ परीक्षा दिली. त्यानंतर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. नोंदणी नाकारल्यामुळे कचरे यांनी अ‍ॅड. शरद नातू मार्फत औरंगाबाद  खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेश देऊन कचरे यांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली. 

३१ जानेवारीला झाला अंतरिम आदेशराज्यातून सुमारे ६५ हजार उमेदवारांनी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता. त्यातील सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले होते. मात्र, खंडपीठाच्या वरील अंतरिम आदेशामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. ३१ जानेवारी २०२० रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेशात दुरुस्ती केल्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या वतीने  सहायक सरकारी वकील अतुल काळे तर हस्तक्षेपकाच्या वतीने अ‍ॅड. दिलीप बनकर पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद