शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या'; सातारा आणि देवळाईतील वसाहती खड्डे अन् चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:36 IST

रस्ते चिखलमय झाले असून, पायी चालणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्देमनपाकडून सुविधा बेदखल  नागरिकांत संतापाची लाट

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : महापालिकेने दुर्लक्ष केलेल्या सातारा, देवळाईतील विविध वसाहतींमधील रस्त्यांवर खड्डे आणि चिखल झाला असून, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.  

मनपात समाविष्ट झालेल्या परिसरात कोणताच निधी उपलब्ध झालेला नाही, जुन्याच निधीतून पाच रस्त्यांची कामे चालू आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सातारा, देवळाई परिसरातील कच्चे रस्ते चिखलमय झाले असून, पायी चालणेही अवघड झाले आहे. चिखल तुडवतच नागरिकांना चालावे लागत आहे. देवळाईच्या नाईकनगर, माऊलीनगर, राजनगर, तसेच अरुणोदय कॉलनी, दिशा घरकुल, म्हाडा परिसराचा रस्ता, छत्रपतीनगर, आलोकनगर, पृथ्वीनगर, आयप्पा मंदिर रोड, लक्ष्मी कॉलनी, पेशवानगर, आमदार रोड, संग्रामनगर, ठाकरेनगर, हायकोर्ट कॉलनी, एकतानगर, सातारा गाव, पटेलनगर, शाहनगर, सुधाकरनगर यासह विविध रस्त्यांवरून जाताना कुठेही शहर असल्याचे जाणवत नाही. मनपात असूनही ग्रामीण भागातील शेतवस्तीवर चिखलमय पाऊलवाटा असल्याचे जाणवत आहे. नागरिकांना घरापर्यंत सुरक्षित जाता यावे, असे रस्ते मनपाने द्यावेत, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल, हरिभाऊ राठोड, पंकजा माने, रणजित ढेपे, सलमान पटेल, रमेश पवार आदींंनी केली आहे.

कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या   सातारा, देवळाईत ज्या पद्धतीने कर लावून वसुलीचा बडगा राबविला जात आहे, त्याला नागरिकांचा विरोध नाही. कर घ्या; परंतु रस्ते, पाणी या महत्त्वाच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्याची गरज आहे. जुलैअखेरीस ३ कोटी ७० लाखांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. जायकवाडीतील पाणीसाठा ६० टक्क्यांच्या वर गेला असल्याने शहराप्रमाणेच सातारा, देवळाईकरांची तहान भागवावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, सोमीनाथ शिराणे, जमील पटेल, शेख झिया, गणेश साबळे, जिजा काळे, पोपटराव सोळनर आदींनी केली आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरWaterपाणी