शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

वाचन संस्कृती कमी होतेय; विद्यार्थी- ग्रंथालयातील अंतर वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:04 IST

सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.

औरंगाबाद : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. शाळांमध्ये तर या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.

२०१५ पासून हा दिवस साजरा केला जातो. १५ ते २२ आॅक्टोबर हा कालावधी वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम यांच्या पुस्तकांसोबतच इतर लेखकांची प्रेरणादायी पुस्तके शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांनीही या पुस्तकांचे वाचन करावे, असे या दिनानिमित्त अपेक्षित आहे. 

वाचन पे्ररणा दिनानिमित्त डॉ. अब्दुल कलाम यांच्याच साहित्याविषयी ‘लोकमत’ने शिक्षण आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले. यामध्ये डॉ. अब्दुल कलाम यांची कोणती पुस्तके आपल्याला माहीत आहेत, याविषयी विचारले असता ९५ टक्के लोकांनी अग्निपंख या एकाच पुस्तकाचे नाव सांगितले. केवळ पाच टक्के लोकांना त्यांच्या इतर पुस्तकांची नावे सांगता आली. अग्निपंख हे पुस्तक आपण वाचले आहे का? या प्रश्नाचे उत्तर ६० टक्के लोकांनी हो असे दिले. ८० टक्के लोकांना अग्निपंखव्यतिरिक्त डॉ. कलाम यांची इतरही अनेक पुस्तके आहेत, हे माहीत नाही. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियावर शेअर केले जाणारे लेख आपण आवर्जून वाचतो. पण पुस्तक विकत घेऊन किंवा गं्रथालयातून आणून किंवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅपवरून डाऊनलोड करून खूप दिवसात वाचले नसल्याचे अनेक तरुणांनी सांगितले.

सादिलवार खर्च बंद झाल्याने अडचणपूर्वी शाळांना सादिलवार खर्च दिला जायचा. या खर्चातून शाळेत पुस्तकांची खरेदी के ली जायची. पण आता हा खर्च देणे बंद केल्यामुळे अनेक शाळांसाठी अभ्यासक्रमासंबंधी पुस्तके घेण्याचीच वानवा असताना अवांतर वाचनाची पुस्तके घेणे फार दूरची गोष्ट झाली आहे. यामुळेही विद्यार्थी आणि ग्रंथालयांचे अंतर शालेय जीवनापासूनच वाढू लागले असल्याची खंत काही साहित्यिकांनी व्यक्त केली.

वाचन टिकले तर संस्कृती टिकेल

केवळ विद्यार्थीच नव्हेतर एकंदरीत सर्वच समाजाचे वाचन कमी झाले आहे. आमच्या पिढीला शालेय जीवनापासून कथा, कादंबऱ्या वाचायची सवय होती, पण आता तर महाविद्यालयातील विद्यार्थीच काय, पण प्राध्यापकांनीही या कादंबऱ्यांचे वाचन केलेले नाही. मातृदिन, पितृदिन आणि आता वाचन पे्ररणा दिन, असे एक दिवसापुरते आपण सगळे मर्यादित करून टाक ले आहे. पण या दिनानिमित्त अंतर्मुख होऊन पाच टक्के लोकांना जरी वाचनाची प्रेरणा मिळाली तरी समाजात वाचन संस्कृती पुन्हा एकदा रुजू होऊ शकेल आणि वाचन टिकले तरच संस्कृती टिकेल.- प्रतापराव बोराडे, प्राचार्य 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीliteratureसाहित्य