शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

वाचन संस्कृती कमी होतेय; विद्यार्थी- ग्रंथालयातील अंतर वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:04 IST

सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.

औरंगाबाद : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. शाळांमध्ये तर या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.

२०१५ पासून हा दिवस साजरा केला जातो. १५ ते २२ आॅक्टोबर हा कालावधी वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम यांच्या पुस्तकांसोबतच इतर लेखकांची प्रेरणादायी पुस्तके शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांनीही या पुस्तकांचे वाचन करावे, असे या दिनानिमित्त अपेक्षित आहे. 

वाचन पे्ररणा दिनानिमित्त डॉ. अब्दुल कलाम यांच्याच साहित्याविषयी ‘लोकमत’ने शिक्षण आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले. यामध्ये डॉ. अब्दुल कलाम यांची कोणती पुस्तके आपल्याला माहीत आहेत, याविषयी विचारले असता ९५ टक्के लोकांनी अग्निपंख या एकाच पुस्तकाचे नाव सांगितले. केवळ पाच टक्के लोकांना त्यांच्या इतर पुस्तकांची नावे सांगता आली. अग्निपंख हे पुस्तक आपण वाचले आहे का? या प्रश्नाचे उत्तर ६० टक्के लोकांनी हो असे दिले. ८० टक्के लोकांना अग्निपंखव्यतिरिक्त डॉ. कलाम यांची इतरही अनेक पुस्तके आहेत, हे माहीत नाही. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियावर शेअर केले जाणारे लेख आपण आवर्जून वाचतो. पण पुस्तक विकत घेऊन किंवा गं्रथालयातून आणून किंवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅपवरून डाऊनलोड करून खूप दिवसात वाचले नसल्याचे अनेक तरुणांनी सांगितले.

सादिलवार खर्च बंद झाल्याने अडचणपूर्वी शाळांना सादिलवार खर्च दिला जायचा. या खर्चातून शाळेत पुस्तकांची खरेदी के ली जायची. पण आता हा खर्च देणे बंद केल्यामुळे अनेक शाळांसाठी अभ्यासक्रमासंबंधी पुस्तके घेण्याचीच वानवा असताना अवांतर वाचनाची पुस्तके घेणे फार दूरची गोष्ट झाली आहे. यामुळेही विद्यार्थी आणि ग्रंथालयांचे अंतर शालेय जीवनापासूनच वाढू लागले असल्याची खंत काही साहित्यिकांनी व्यक्त केली.

वाचन टिकले तर संस्कृती टिकेल

केवळ विद्यार्थीच नव्हेतर एकंदरीत सर्वच समाजाचे वाचन कमी झाले आहे. आमच्या पिढीला शालेय जीवनापासून कथा, कादंबऱ्या वाचायची सवय होती, पण आता तर महाविद्यालयातील विद्यार्थीच काय, पण प्राध्यापकांनीही या कादंबऱ्यांचे वाचन केलेले नाही. मातृदिन, पितृदिन आणि आता वाचन पे्ररणा दिन, असे एक दिवसापुरते आपण सगळे मर्यादित करून टाक ले आहे. पण या दिनानिमित्त अंतर्मुख होऊन पाच टक्के लोकांना जरी वाचनाची प्रेरणा मिळाली तरी समाजात वाचन संस्कृती पुन्हा एकदा रुजू होऊ शकेल आणि वाचन टिकले तरच संस्कृती टिकेल.- प्रतापराव बोराडे, प्राचार्य 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीliteratureसाहित्य