शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून गोदापात्रात पुन्हा विसर्ग; १६ दरवाजे ६ इंचाने उघडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 18:20 IST

गोदाकाठच्या नागरिकांना इशारा

ठळक मुद्देमहिनाभरापूर्वी उघडले होते दरवाजे गोदावरी पात्रात ९९७३  क्युसेक विसर्ग

पैठण : रविवारी सायंकाळी धरणातील जलसाठा १०० टक्क्यांकडे आगेकूच करीत असताना धरणात येणारी आवक १७ हजार क्युसेकपर्यंत वाढल्याने धरणाचे १६ दरवाचे सहा इंचाने वर उचलून गोदावरी पात्रात ९९७३  क्युसेक विसर्ग करण्यात आला. धरणात येणारी आवक वाढली तर त्या प्रमाणात धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान पाणी सोडताना धरणाचा जलसाठा ९८ टक्के राखला जाईल, असे धोरण जायकवाडी प्रशासनाने कायम केले असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.  जलक्षमता१५२२ फूट असलेल्या जायकवाडी धरणाचीपाणीपातळी ही १५२१.९३ झाल्याने धरणातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अधीक्षक अभियंता म्हेत्रे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे  आदींच्या पथकाने धरणाचे दरवाजा क्रमांक १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० अर्धाफूटवर उचलून गोदावरी पात्रात ८३८४ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक इतका असा एकुण ९९७३ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

महिनाभरापूर्वी उघडले होते दरवाजे जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५२१.९३ झाली असून, धरणात एकूण जलसाठा २९००.६८३ दलघमी झाला आहे. यापैकी २१६२.५७७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. यंदा धरणातून १५ आॅगस्ट रोजी दरवाजे उचलून प्रथम पाणी सोडण्यात आले होते. यानंतर रविवारी १५ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे उचलून परत पाणी सोडण्यात आले आहे.

गोदाकाठच्या नागरिकांना इशाराजायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग वाढवावा लागणार असल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी यंत्रणेमार्फ त  गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद