शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:57 IST

२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते.

औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. के. एल. वडणे यांनी आज  रद्द केले. 

२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे परत येत असताना बदनापूर येथे १० ते १५ लोकांनी 'राज ठाकरे झिंदाबाद ' अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली तसेच 'राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना' राज्यातून हाकला असा आदेश राज ठाकरे यांनी दिला असल्याचे घोषणा दिल्या. या विरुद्ध बस चालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १०- ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादवी कलम ३३६, १४३, १०९ , ११४ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विषयक कायद्याचे कलम ३ आणि 4 तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी ३० जानेवारी २०९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वारंट ( नॉन बेलेबल ) जारी केले. राज ठाकरे यांच्यावतीने अॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला. 

त्याविरुद्ध ठाकरे यांनी त्यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोप पत्रास अंतरिम स्थगिती दिली होती. आज याचीकेवर अंतिम सुनावणी झाली असता अॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१/१०/२००८ रोजी बदनापूर येथील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूर मधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष नायालयात सादर करू शकला नाही ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठानेवरील आदेश दिला. या प्रकणात अॅड. सागर लड्डा यांना अॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी