शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:57 IST

२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते.

औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. के. एल. वडणे यांनी आज  रद्द केले. 

२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे परत येत असताना बदनापूर येथे १० ते १५ लोकांनी 'राज ठाकरे झिंदाबाद ' अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली तसेच 'राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना' राज्यातून हाकला असा आदेश राज ठाकरे यांनी दिला असल्याचे घोषणा दिल्या. या विरुद्ध बस चालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १०- ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादवी कलम ३३६, १४३, १०९ , ११४ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विषयक कायद्याचे कलम ३ आणि 4 तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी ३० जानेवारी २०९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वारंट ( नॉन बेलेबल ) जारी केले. राज ठाकरे यांच्यावतीने अॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला. 

त्याविरुद्ध ठाकरे यांनी त्यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोप पत्रास अंतरिम स्थगिती दिली होती. आज याचीकेवर अंतिम सुनावणी झाली असता अॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१/१०/२००८ रोजी बदनापूर येथील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूर मधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष नायालयात सादर करू शकला नाही ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठानेवरील आदेश दिला. या प्रकणात अॅड. सागर लड्डा यांना अॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी