शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

Raj Thackeray: राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:49 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली.

औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी १६ अटी घालून दिल्या होत्या. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, याच्यासह आवाजाची मर्यादा देखील देण्यात आली होती. 

राज ठाकरेंनी सभेत पोलिसांनी दिलेल्या १६ पैकी किती अटी पाळल्या, याबाबत आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना निखील गुप्ता म्हणाले की, सभेत किती नियम मोडले याबाबत आम्हाला अद्यात माहिती मिळाली नाही. मात्र आम्ही सर्व गोष्टींचा अभ्यास करुन पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असं निखील गुप्ता यांनी सांगितलं. 

 राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जात आहे, त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरेंनी घ्यायचा नाही आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करणं आणि समाजा समाजामध्ये भावना भडकतील कशा, द्वेश निर्माण होईल याचाच प्रयत्न केला. कालचं भाषण पोलीस ऐकतील. त्यानंतर काय आक्षेपार्ह आहे काय नाही याबाबत निर्णय घेतील आणि त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगतले.

दरम्यान, राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही वळसे पाटील यांनी समाचार घेतला, ते म्हणाले की, राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केल्याने त्यांच्यावर काही परिणाम होईल असं नाही. पवार साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यांनी नेहमी विकासाचं काम केलेलं आहे. समाजाला एकत्र ठेवण्याचं, उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्यामाध्यमातून हजारो निर्णय झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आजची समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सांगण्याला काहीच कार्यक्रम नाही ते असे आरोप करतात.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस