शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड; खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होणार

By बापू सोळुंके | Updated: September 9, 2023 19:59 IST

जिल्ह्यात दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ६१ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील ३२१ गावांत २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या २५ टक्के अग्रीम विमा कंपनीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने मंगळवारी घेतला. तर जिल्ह्यातील सर्वच मंडळातील कमीत कमी १६ दिवस ते जास्तीत जास्त ४० दिवसांचा खंड पावसाने दिला आहे. त्यामुळे या मंडळातील पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार असल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यात दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ६१ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच कृषी मंडळ कार्यालयात जूनपासून आतापर्यंत १६ ते ४० दिवसांचा खंड पडलेला आहे. तर जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यातील २० कृषी मंडळांतर्गत येणाऱ्या ३२१ गावांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाने खंड दिल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल जिल्हा हवामान केंद्राकडून प्राप्त होताच कृषी, महसूल विभाग, स्कायमेट, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या तालुकास्तरीय समितीने नुकतेच पीक सर्वेक्षण केले.

या समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ३२१ गावांतील पिकांचे पावसाअभावी प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता वर्तविली. नियमानुसार खरीप हंगामात पावसाने सलग २१ दिवस खंड शेतकऱ्यांना एकूण विम्याच्या २५ टक्के अग्रीम रक्कम द्यावी, असा नियम आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ३२१ गावांतील कापूस, सोयाबीन, मका या पिकांचा विमा घेतलेले शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाईस पात्र ठरत असल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा शेतकऱ्यांना तत्काळ अग्रीम रक्कम देण्यात यावी, यासाठी विमा कंपनीला आदेश काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील सर्वच गावांत दुष्काळी स्थितीविमा कंपनीच्या नियमानुसार २१ दिवसांचा पावसाचा खंड असेल तरच पिकाचे नुकसान झाले, असे गृहीत धरले जाते. केवळ तांत्रिक अटीमुळे लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद