शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:12 IST

शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी वृष्टी : नागरिकांना छळण्यात महापालिका आणि महावितरणमध्ये लागली स्पर्धा; शहराचे कसे होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते. हर्सूल पॉवर हाऊस येथे ३३ केव्ही केबल निकामी झाल्यामुळे छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा ७ तास खंडित होता, तर बन्सीलालनगर परिसराचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तासांनंतर पूर्ववत झाला.शहरात काल रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महावितरणचे पितळ उघडे पाडले. पावसाळ्यात नागरिकांना अखंडित वीज मिळावी म्हणून महावितरणने केलेली मान्सूनपूर्व कामे पावसाअगोदर दिलासा देणारी असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती वल्गनाच ठरली. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास अवघे शहर अंधारात बुडाले होते. शहराच्या जुन्या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरणचे शहरात क्रमांक- १ व क्रमांक- २ असे दोन विभाग कार्यरत आहेत. विभाग क्रमांक- १ अंतर्गत छावणी, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भावसिंगपुरा, भीमनगर, पेठेनगर, पडेगाव, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, सिल्कमिल कॉलनी, गोलवाडी, सातारा परिसर, देवळाई, रोजाबाग, औरंगपुरा, हर्सूल, जटवाडा रोड, तसेच शहर क्रमांक- २ अंतर्गत भारतनगर, गारखेडा, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, सिडकोतील विविध सेक्टर संपूर्णपणे अंधारात बुडाले. हर्सूल येथे ३३ केव्ही केबल निकामी झाल्यामुळे महावितरणच्या छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा रात्री ११ वाजता खंडित झाला. या उपकेंद्राला हर्सूल पॉवर हाऊस येथून वीजपुरवठा होतो. अभियंते-कर्मचाºयांनी भर पावसात अथक प्रयत्न केले; पण पहाटेपर्यंत केबल दुरुस्त होऊ शकली नाही. अखेर सकाळी दुसºया केबलमार्फत छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू केला, तेव्हा सकाळी ६ वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. याच उपकेंद्रांतर्गत बन्सीलालनगरचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तासांनंतर पूर्ववत झाला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यामुळे रात्री त्या परिसरातील तीन फिडर बंद पडले. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा औद्योगिक परिसर व लगतचा परिसर तीन तासांहून अधिक काळ अंधारात होता. रेणुकानगर येथील फिडर बंद पडल्यामुळे भारतनगर, हनुमाननगर, तसेच गारखेडालगतच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नयासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग म्हणाले की, पावसामुळे शहरातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भात महावितरणने सुरू केलेल्या कंट्रोल रूमकडे जवळपास ७० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार महावितरणच्या अधिकारी, अभियंते व कर्मचाºयांनी भरपावसात शर्थीचे प्रयत्न करून ठिकठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत केला. छावणी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील केबल दुरुस्तीला थोडा विलंब लागला.दोन बळी घेतल्यानंतर महापालिकेला जागऔरंगाबाद : शहरातील सर्व धोकादायक मॅनहोल बंद करा, पुलांना सुरक्षा कठडे नसतील तर युद्धपातळीवर ते उभारण्याचे काम सुरू करावे, असे आदेश शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले. जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. धोकादायक बाब कुठेच दिसता कामा नये, असे आदेश आता सर्व वॉर्ड कार्यालयांना बजावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात दोन दिवसांत दोन बळी गेल्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल शहरभर संतापाची लाट पसरली आहे.मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर येथे मॅनहोलमध्ये पडून भगवान मोरे या गरीब कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तासही झालेले नसताना गुरुवारी मध्यरात्री सिडको एन-६ भागातील बजरंग चौकात चेतन चोपडे या ३५ वर्षीय तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे शहरात महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जयभवानीनगर येथे धोकादायक नाल्यावर वेळीच ढापे टाकले गेले असते, तर मोरे यांचा मृत्यू झालाच नसता, अशी भावना नागरिक बोलून दाखवीत आहेत.मागील वर्षीही तरुणाचा मृत्यूबजरंग चौक येथे नाल्याच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून नारेगाव येथील १८ वर्षीय गरीब तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महापालिकेने बोध घेतला नाही. शहरात किमान ३५० ठिकाणी मॅनहोल उघडे असतील. पुलांना कठडे नसलेली ४० पेक्षा अधिक ठिकाणे असावीत, असा अंदाज मनपानेच वर्तविला आहे.

टॅग्स :RainपाऊसMuncipal Corporationनगर पालिकाelectricityवीज