शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांतील पावसाचा निच्चांक

By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST

राजेश गंगमवार, बिलोली मागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़

राजेश गंगमवार, बिलोलीमागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़ दरम्यान, गतवर्षी अवघ्या दीड महिन्यांत ४२० मि़मी़ पाऊस झाला होता़ तालुक्यात दुबार पेरण्यांना प्रारंभ झाला असून शेतकरी हैराण झाला आहे़बिलोली तालुक्याला मांजरा-गोदावरी नदीने वेढलेले आहे़ तालुक्यातील बहुसंख्य गावे नदीकाठी आहेत़ पण मागच्या दीड महिन्यांत अतिशय कमी पाऊस झाल्याने दोन्ही नद्या कोरड्याठाक झाल्या आहेत़ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली़ प्रारंभी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या़ गतवर्षी प्रमाणेच पाऊस पडेल या आशेवर सर्वच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या़ प्रामुख्याने सोयाबीन व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली़ जूनच्या दुसऱ्या आठवड्यातील पावसानंतर वरूणराजाने रुसवा काढला तो जुलै उजडला तरी पाऊस झाला नाही़ जुलैच्या महिन्यातील २० दिवसांत १५ मि़मी़ देखील पाऊस नव्हता़ उलट उन्हाळ्याप्रमाणे तापमानाचा पारा वाढला व उगवलेली पिके सुद्धा वाया गेली़ पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला़ पावसाची वाट पाहून पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ शेतकऱ्यांकडे आता पावसाची प्रतीक्षा असून शेती कामेच ठप्प आहेत़ परिणामी मजुरांनाही कामे नाहीत़ गतवर्षी पावसाने प्रारंभीपासूनच वेळेवर हजेरी लावल्याने शेती कामांना वेग होता़ परिणामी सर्वच गावांत शेतीकामे सर्वांकडेच असल्याने शेतमजुरांना चांगलीच मागणी होती़ समूह मजूर शेतीच्या कामांचा ठेका घेत असत़ पण पावसाने डोळे वटारल्याने शेतमजुरांना कामच नाही, अशी परिस्थिती ग्रामीण भागात झाली आहे़तालुक्यातील कुंडलवाडी, रामतीर्थ, आरळी, आदमपूर व सगरोळीसह बिलोली परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ ऐन पावसाळ्याच्या महिन्यातच पाऊस नसल्याने उन्हाळ्याप्रमाणे उकाडा सुरू झाला आहे़ तर मागच्या २५ वर्षात इतका कमी पाऊस झाला नव्हता असे जाणकार वयोवृद्ध सांगत आहेत़ सहा वर्षापूर्वी २००८ मध्ये ९० मि़मी़ पाऊस झाला होता़ तेव्हा देखील अशीच स्थिती होती़ पण लगेच मोठा पाऊस झाला़ त्यात शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली़ यावर्षीच्या हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने पाणीपातळी खालावली आहे़ मांजरा-गोदावरी दोन्ही नद्या अद्यापही कोरड्याच आहेत़ ७ जून ते २० जुलैपर्यंत मागील दहा वर्षांत झालेला पाऊस२००४-१९८ मि़मी़२००५-३०२ मि़मी़२००६-२१० मि़मी़२००७-१८८ मि़मी़२००८-९० मि़मी़२००९-१६२ मि़मी़२०१०-१७५ मि़मी़२०११-१८२ मि़मी़२०१२-१८८ मि़मी़२०१३-४२० मि़मी़२०१४-७० मि़मी़