शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

पाऊस लांबला; मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:56 IST

Rain Delay in Marathwada : शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली.

ठळक मुद्देमराठवाड्यात ६५ टक्के पेरण्या पूर्णशेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

औरंगाबाद : मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, येणाऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ( Crisis of double sowing in Marathwada) 

औरंगाबाद जिल्ह्यात ६३ टक्के, जालन्यात ७६ टक्के, बीड जिल्ह्यात ८६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात ५९ टक्के, उस्मानाबाद ६२ टक्के, नांदेड ७६ टक्के, परभणी ६३ टक्के, हिंगोलीत ७१ टक्के पेरण्या आजवर झाल्या आहेत. ६५ टक्क्यांच्या आसपास मराठवाड्यात पेरण्या झाल्याची प्राथमिक आकडेवारी सांगते.

सोमवारी शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली. सध्या पावसाचा खंड असला तरी जुलै महिन्यात पावसाचा चांगला अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर विभागातील परिस्थिती पाहता दुबार पेरणी करावी लागेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

यंदाच्या जूनमध्ये २०० मि. मी. पाऊसयंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. विभागात यंदाच्या जून महिन्यात फक्त आठ दिवस पाऊस झाला आहे. २०० मिलिमीटर पावसाची नोंद विभागात नोंदविली गेली असली तरी अनेक जिल्ह्यांत जून महिन्याची सरासरीदेखील पूर्ण झालेली नाही.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेती