शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: February 21, 2024 19:02 IST

जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यात पाणी सोडावे, या मागणीसाठी सिंचन भवनसमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्चस्तरीय बंधारा, मंगरूळ, लोणी सावंगी, तारूगव्हाण आणि दिग्रस बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे रब्बीची पिके वाळू लागली आहेत. सोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या बंधाऱ्यांत तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी बुधवारी सिंचन भवनसमोर धरणे देत निदर्शने केली.

‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजेपासून जालन रोडवरील सिंचन भवन समोर धरणे धरले. या आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘कडा’ प्रशासकांनी नुकतेच हिरडपुरी आणि आपेगाव बंधाऱ्यासाठी पाणी सोडले आहे.

मात्र,अद्यापही ढालेगाव उच्चस्तरीय बंधारा, मंगरूळ, लोणी सावंगी, तारूगव्हाण आणि दिग्रस बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले नाही. यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता, तातडीने पाणी सोडावे, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात शिवाजी कदम, ज्ञानेश्वर काळे, अमृत गिराम, पांडुरंग गिराम, विलास दळवे, प्रकाश गिराम, वसंतराव गिराम आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीparabhaniपरभणीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद