शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: February 21, 2024 19:02 IST

जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यात पाणी सोडावे, या मागणीसाठी सिंचन भवनसमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्चस्तरीय बंधारा, मंगरूळ, लोणी सावंगी, तारूगव्हाण आणि दिग्रस बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे रब्बीची पिके वाळू लागली आहेत. सोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या बंधाऱ्यांत तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी बुधवारी सिंचन भवनसमोर धरणे देत निदर्शने केली.

‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजेपासून जालन रोडवरील सिंचन भवन समोर धरणे धरले. या आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘कडा’ प्रशासकांनी नुकतेच हिरडपुरी आणि आपेगाव बंधाऱ्यासाठी पाणी सोडले आहे.

मात्र,अद्यापही ढालेगाव उच्चस्तरीय बंधारा, मंगरूळ, लोणी सावंगी, तारूगव्हाण आणि दिग्रस बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले नाही. यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता, तातडीने पाणी सोडावे, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात शिवाजी कदम, ज्ञानेश्वर काळे, अमृत गिराम, पांडुरंग गिराम, विलास दळवे, प्रकाश गिराम, वसंतराव गिराम आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीparabhaniपरभणीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद