शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

चिकलठाणा विमानतळावर पार्किंग शुल्काच्या नावाखाली नागरिकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:41 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग शुल्काच्या नावाखाली प्रवासी आणि वाहनधारकांची अक्षरश: लूट केली जात आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग शुल्काच्या नावाखाली प्रवासी आणि वाहनधारकांची अक्षरश: लूट केली जात आहे. विमानतळावर पिकअप आणि ड्रॉपसाठी ५ मिनिटांपर्यंत पार्किंग मोफत आहे. ही मोफत सुविधा टाळण्यासाठी शुल्क वसुलीची जुनी कॅबिन बंद करून थेट आऊट गेटजवळ नवीन कॅबिन करण्यात आली.कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा आर्थिक आणि मानसिक फटका दररोज अनेक प्रवासी, वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

विमानतळावर प्रवेश केल्यानंतर पाच मिनिटांत प्रवाशांची ने-आण (पिकअप आणि ड्रॉप) करून बाहेर पडल्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. यासंदर्भात प्रवेशद्वाराजवळ फलकदेखील लावलेला आहे. यापूर्वी पार्किंग शुल्कासाठी आऊट गेटवरील मार्गात कॅबिन होती. ही कॅबिन पाच मिनिटांत विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत होती. यामुळे पार्किंगमध्ये वाहन उभे न करता केवळ प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनधारकांना कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते. परंतु तीन महिन्यांपूर्वी पार्किंग नवीन कंत्राटदारांकडे आले. तेव्हापासून पार्किंगचालक आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि उद्धट वागणुकीला सुरवात झाली. प्रत्येकाकडून पार्किंग शुल्काची वसुली करण्यासाठी शक्कल लढवून आऊट गेटवरील जुनी कॅबिन बंद करण्यात आली. जुन्या कॅबिनच्या कितीतरी पुढे नवीन कॅबिन बनविली. या नव्या कॅबिनमधून बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांकडून शुल्क वसुली सुरू करण्यात आली.

नव्या कॅबिनमुळे वाहन विमानतळावर प्रवेश केल्यापासून तर बाहेर पडेपर्यंतची नोंद होण्याचे अंतर वाढले आहे. त्यात भर म्हणून पार्किंगमधील कर्मचारी सर्वात प्रथम बाहेर पडण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांबरोबर शाब्दिक वाद घालतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी पाच मिनिटांत बाहेर पडू इच्छिणाऱ्या वाहनधारकांना ताटकळावे लागते. यासंदर्भात वाहनधारकांनी, प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. ट्विटरवर  अनेकांनी हा प्रकार मांडला. विमानतळ प्राधिकरणाकडून पार्किंगचालकास सूचना करण्यात आली. परंतु वर्तणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही. 

पहाटेच्या प्रवाशांना मनस्तापपार्किंगचालकाच्या वागणुकीचा पहाटेच्या वेळी ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वाधिक फटका बसत आहे. जुनी कॅबिन बंद केल्याने अंतर वाढले आहे. पाच मिनिटांत बाहेर पडत असतानाही बळजबरीने पार्किंग शुल्काची मागणी केली जाते. दोन दिवसांपूर्वीच एका वाहनधारकास याचा मनस्ताप सहन करावा लागला. यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही कल्पना दिली आहे. प्रवाशांबरोबर असभ्य वर्तणूक वाढल्याने पार्किंगचालकाचे कंत्राट रद्द केले पाहिजे.- जसवंतसिंग, अध्यक्ष , टुरिझम प्रमोटर्स गिल्ड

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळParkingपार्किंगMONEYपैसाfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलर