शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

'आश्वासनांची गाजरं नको', शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी मनसेचे रेल्वेक्रॉसिंगजवळ आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: November 9, 2022 11:44 IST

मनसे कार्यकर्त्यांनी हातात गाजरे घेऊन प्रशासन जनतेला केवळ खोटी आश्वासन देत आहे, असे नमूद करून जोरदार आंदोलन केले.

औरंगाबादशिवाजीनगर ते  देवळाई चौक दरम्यान असलेल्या  रेल्वे फटकामुळे रहिवाशांना अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तेथे भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मात्र अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जनतेचा त्रास जैसे थे आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथे भुयारी रेल्वे मार्ग करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज सकाळी सुमारे तासभर जोरदार निदर्शने करण्यात आली.

शहरातील नागरिकांना देवळाई चौक, बीड बायपासकडे जाण्यासाठी शिवाजीनगर रेल्वे रुळावरून ये- जा करावी लागते. शिवाजीनगर येथील या मार्गावर रेल्वेचे फाटक आहे. दर अर्धा तासाला रेल्वे गाडी, मालगाडी ची ये -जाय चालू असते. यामुळे शिवाजीनगर येथील हे फाटक बंद केल्या जाते. फाटक बंद होताच या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही वाहन चालक जीव धोक्यात घालून फाटका खालून घुसतात. बऱ्याचदा घाई घाईने रोडवरून जाताना अनेकांना दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

फाटक बंद होताच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. वाहन चालक कर्कश हॉर्न वाजवतात यामुळे परिसरातील रहिवासी आणि दुकानदार नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाजीनगर येथील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे .केवळ भूसंपादन रखडल्याने हा भुयारी मार्ग आतापर्यंत होऊ शकला नाही. पालकमंत्री महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे या भुयारी मार्गासाठी निधी उपलब्ध करावा आणि जनतेला या त्रासातून मुक्त करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेवतीने बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे निदर्शने करण्यात आली. 

कार्यकर्त्यांनी हातात गाजरे घेऊन प्रशासन जनतेला केवळ खोटी आश्वासन देत आहे, असे नमूद करून जोरदार आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात अनिकेत निलावार, राजू जावळीकर, लीला राजपूत, हेमंत जाधव, शिवम बोराडे, गणेश निकम, मोनू तुसे, प्रशांत जोशी, गणेश सोळुंके, अण्णा मगरे, विशाल आहेर आदींनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेrailwayरेल्वे