शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना जपा; श्वसनविकारासह न्यूमोनिया, ताप, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले!

By संतोष हिरेमठ | Updated: May 23, 2024 19:01 IST

मुलांचे आरोग्य बिघडल्याने पालकांना ‘ताप’

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील चढ-उतारामुळे सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया, तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्याबरोबरच गॅस्ट्रोचेही रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांत बालरुग्णांची संख्या वाढली आहे. ओपीडीत येणाऱ्या १० पैकी ५ मुले श्वसन विकाराने त्रस्त होत आहेत. उघड्यावरचे पदार्थ, पाणी टाळावे. अतिथंड पदार्थ मुलांना देणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत रोज १२००-१३०० रुग्ण येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले.

वातावरणातील चढ-उताराचा फटकागेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत चढ-उतार होत आहे. त्याचा फटका बसत नागरिकांना बसत आहे. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका बसत आहे.

या आजाराचे रुग्ण वाढलेश्वसनविकार : बालरोगतज्ज्ञ डाॅ. अभय जैन म्हणाले, मागील एक आठवड्यापासून सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. न्यूमोनियाचे रुग्णही वाढले आहे.गॅस्ट्रो : बालरोगतज्ज्ञ डाॅ. प्रशांत चव्हाण म्हणाले, सध्या गॅस्ट्रोचे रुग्ण अधिक आहे. मुलांना डायरिया झाल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी हलका आहार सुरू ठेवावा आणि तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.न्यूमोनिया : १० पैकी ५ मुलांना सर्दी, खोकला आढळत आहे. त्यात एकाला न्यूमोनियाचे निदान होत आहे, असे डाॅ. अभय जैन यांनी सांगितले.ताप : तापेच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. मुलांना अचानक ताप येतो आणि कमी होतो. असे वारंवार होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत.

रोज १००-१२५ रुग्णांची ओपीडीजिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या रोज १०० ते १२५ बालरुग्ण उपचारासाठी येत आहे. यात उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, ‘व्हायरल’च्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

पाणी उकळून द्यावेसध्या उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, ‘व्हायरल’चा त्रास मुलांमध्ये अधिक पाहायला मिळत आहे. मुलांना देण्यात येणारे पाणी उकळून थंड केलेले असावे. अतिथंड पाणी देणे टाळावे.-डाॅ. गोविंद भोसले, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद