शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यावेतनाचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : पीएलए निधीतून २४० निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन करण्याचा घाटी प्रशासनाचा प्रस्ताव जिल्हा कोषागार कार्यालयाने धुडकावून लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

औरंगाबाद : पीएलए निधीतून २४० निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन करण्याचा घाटी प्रशासनाचा प्रस्ताव जिल्हा कोषागार कार्यालयाने धुडकावून लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आॅक्टोबर महिन्याचे विद्यावेतन पीएलए फंडातून करण्यात आले होते. कोषागार कार्यालयाच्या दणक्यामुळे घाटीतील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन दोन महिन्यांपासून रखडले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुमारे २४० निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या निवासी डॉक्टरांना शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाते. शासनाच्या नॉन प्लॅन योजनेंतर्गत असलेल्या विशेष निधीतून वेतनावर खर्च केला जातो. दरमहा विशिष्ट रक्कम शासकीय महाविद्यालयाच्या खात्यावर जमा केली जाते. घाटीसाठी सुमारे १४ लाख रुपयांची गरज आहे. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीपासूनच विद्यावेतनासाठी ६ ते ९ लाख रुपये घाटीच्या खात्यात जमा केले जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. सूत्राने सांगितले की, आॅक्टोबरपासून विद्यावेतनाचा निधी शासनाकडून आलाच नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांकडून वारंवार विद्यावेतनासाठी मागणी होत असल्याने घाटी प्रशासनाने पीएलए निधीतून विद्यावेतन अदा करण्यासंदर्भात वैद्यकीय संचालकांकडून परवानगी मिळविली. त्यानंतर कोषागारात पगारपत्रक सादर करून पीएलए फंडातून आॅक्टोबर महिन्याचे विद्यावेतन नोव्हेंबर महिन्यात अदा करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत शासनाकडून विद्यावेतनाचा निधी घाटीला देण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासनास नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे विद्यावेतन निवासी डॉक्टरांना अदा करता आले नाही. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांची विशेष परवानगी घेऊन घाटी प्रशासनाने पुन्हा निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पीएलए फंडातून अदा करण्यासाठी पगार बिल तयार करून ते कोषागार कार्यालयास सादर केले. जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत संचालकांच्या परवानगीने पीएलए फंडातून विद्यावेतन देता येते, असा शासन निर्णय असल्यास तो सादर करा, तरच पीएलए फंडातून वेतन अदा क रण्यास परवानगी देतो, असे बजावले. मात्र, अद्यापपर्यंत शासनाने असा कोणताही आदेश काढलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विद्यावेतनाचा प्रस्ताव कोषागार कार्यालयाने धुडकावला. परिणामी दोन महिन्यांपासून विद्यावेतनाचा प्रलंबित प्रश्न आजही कायम आहे.