शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:12 IST

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे.

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केलेली नाही. परिसरातील दुरवस्थेमुळे पावसाळ्यात अंगणात पावसाचे पाणी साचले असून सरपटणारे प्राणी रोज दृष्टीस पडत आहेत.

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे. काही जणांच्या तर येथील धोकादायक वळणाच्या रस्त्यांमुळे अपघात होऊन पायामध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आले आहेत. नागरिकांना चिखल तुडवत घर गाठावे लागते. पावसाळ्यात घरासमोर समुद्रासारखी बेटे तयार होत आहेत. साप, बेडूक घरात शिरतात. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटीचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात येत आहे. परंतु साताऱ्यातील नवीन वसाहतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यापर्यंत कुणाचेच लक्ष नाही. येथील प्रश्न मांडावे तरी कुणाकडे, हा प्रश्न अनुत्तरित आहे, असे नामदेव बाजड, रोहन पवार, शंकर म्हस्के आदींनी उपस्थित केला आहे.

आश्वासने पूर्ण कधी करणार?मुलांना शाळेतून घरी नेताना किंवा कामावरून घरी जाताना अपघात होईल, हीच भीती मनात असते. महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने कधी पूर्ण होणार आहे.- सुबोध पगारे, रहिवासी

घराभोवती तुंबते पाणीपाहुण्याला घराचा पत्ता सांगताना पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या पलीकडे बघितले, तर तेच आपले घर, असे म्हणावे लागते. आणखी किती दिवस महानगरपालिकेत असूनही दुर्लक्षित विभागासारखा परिचय द्यावा.- प्रफुल्ल कुलकर्णी रहिवासी

वाहन पार्किंग घरापासून दूरघरासमोर साचलेल्या सखोल पाण्याच्या डबक्यामुळे महागडी वाहनेदेखील घरापर्यंत नेऊ शकत नाहीत, ही आमची शोकांतिका आहे.-पूजा कुलकर्णी, रहिवासी

कर घेता, मग सुविधा कधी देता?तिजोरी भरण्यासाठी मनपाने गुंठेवारी तसेच कर वसुली केली आहे. नागरिकांना त्यातुलनेत सेवासुविधा कधी देणार, असा प्रश्न अनुत्तरित आहे.- प्रवीण चव्हाण, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका