शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:12 IST

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे.

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केलेली नाही. परिसरातील दुरवस्थेमुळे पावसाळ्यात अंगणात पावसाचे पाणी साचले असून सरपटणारे प्राणी रोज दृष्टीस पडत आहेत.

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे. काही जणांच्या तर येथील धोकादायक वळणाच्या रस्त्यांमुळे अपघात होऊन पायामध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आले आहेत. नागरिकांना चिखल तुडवत घर गाठावे लागते. पावसाळ्यात घरासमोर समुद्रासारखी बेटे तयार होत आहेत. साप, बेडूक घरात शिरतात. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटीचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात येत आहे. परंतु साताऱ्यातील नवीन वसाहतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यापर्यंत कुणाचेच लक्ष नाही. येथील प्रश्न मांडावे तरी कुणाकडे, हा प्रश्न अनुत्तरित आहे, असे नामदेव बाजड, रोहन पवार, शंकर म्हस्के आदींनी उपस्थित केला आहे.

आश्वासने पूर्ण कधी करणार?मुलांना शाळेतून घरी नेताना किंवा कामावरून घरी जाताना अपघात होईल, हीच भीती मनात असते. महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने कधी पूर्ण होणार आहे.- सुबोध पगारे, रहिवासी

घराभोवती तुंबते पाणीपाहुण्याला घराचा पत्ता सांगताना पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या पलीकडे बघितले, तर तेच आपले घर, असे म्हणावे लागते. आणखी किती दिवस महानगरपालिकेत असूनही दुर्लक्षित विभागासारखा परिचय द्यावा.- प्रफुल्ल कुलकर्णी रहिवासी

वाहन पार्किंग घरापासून दूरघरासमोर साचलेल्या सखोल पाण्याच्या डबक्यामुळे महागडी वाहनेदेखील घरापर्यंत नेऊ शकत नाहीत, ही आमची शोकांतिका आहे.-पूजा कुलकर्णी, रहिवासी

कर घेता, मग सुविधा कधी देता?तिजोरी भरण्यासाठी मनपाने गुंठेवारी तसेच कर वसुली केली आहे. नागरिकांना त्यातुलनेत सेवासुविधा कधी देणार, असा प्रश्न अनुत्तरित आहे.- प्रवीण चव्हाण, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका