शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:12 IST

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे.

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केलेली नाही. परिसरातील दुरवस्थेमुळे पावसाळ्यात अंगणात पावसाचे पाणी साचले असून सरपटणारे प्राणी रोज दृष्टीस पडत आहेत.

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे. काही जणांच्या तर येथील धोकादायक वळणाच्या रस्त्यांमुळे अपघात होऊन पायामध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आले आहेत. नागरिकांना चिखल तुडवत घर गाठावे लागते. पावसाळ्यात घरासमोर समुद्रासारखी बेटे तयार होत आहेत. साप, बेडूक घरात शिरतात. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटीचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात येत आहे. परंतु साताऱ्यातील नवीन वसाहतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यापर्यंत कुणाचेच लक्ष नाही. येथील प्रश्न मांडावे तरी कुणाकडे, हा प्रश्न अनुत्तरित आहे, असे नामदेव बाजड, रोहन पवार, शंकर म्हस्के आदींनी उपस्थित केला आहे.

आश्वासने पूर्ण कधी करणार?मुलांना शाळेतून घरी नेताना किंवा कामावरून घरी जाताना अपघात होईल, हीच भीती मनात असते. महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने कधी पूर्ण होणार आहे.- सुबोध पगारे, रहिवासी

घराभोवती तुंबते पाणीपाहुण्याला घराचा पत्ता सांगताना पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या पलीकडे बघितले, तर तेच आपले घर, असे म्हणावे लागते. आणखी किती दिवस महानगरपालिकेत असूनही दुर्लक्षित विभागासारखा परिचय द्यावा.- प्रफुल्ल कुलकर्णी रहिवासी

वाहन पार्किंग घरापासून दूरघरासमोर साचलेल्या सखोल पाण्याच्या डबक्यामुळे महागडी वाहनेदेखील घरापर्यंत नेऊ शकत नाहीत, ही आमची शोकांतिका आहे.-पूजा कुलकर्णी, रहिवासी

कर घेता, मग सुविधा कधी देता?तिजोरी भरण्यासाठी मनपाने गुंठेवारी तसेच कर वसुली केली आहे. नागरिकांना त्यातुलनेत सेवासुविधा कधी देणार, असा प्रश्न अनुत्तरित आहे.- प्रवीण चव्हाण, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका