शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शहरात शांतता आणि गुन्हे नियंत्रणाला प्राधान्य : निखिल गुप्ता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:47 IST

शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी मावळते आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून पदभार स्वीकारला.

ठळक मुद्देशहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले असल्याने पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा येथे रुजू होत असल्यामुळे घरी आल्यासारखे वाटत आहेआपल्या कार्यालयाची दारे जनतेसाठी कायम उघडी असतील

औरंगाबाद :  शहरात शांतता ठेवणे, गुन्हे नियंत्रण आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी  कल्याणकारी योजना राबविण्यास आपले प्राधान्य असल्याचे नूतन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शुक्रवारी सांगितले.

शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी मावळते आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले असल्याने पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा येथे रुजू होत असल्यामुळे घरी आल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यम आणि जनतेला सोबत घेऊन काम करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  पोलीस आयुक्त प्रसाद यांचे काम पुढे न्यायचे असल्याचे ते म्हणाले. 

जनतेने चांगल्या सूचना मोकळेपणाने कराव्यातशहरात शांतता राखून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, दाखल झालेल्या गुन्ह्याचा तात्काळ निपटारा करणे आणि शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यास प्राधान्य आहे.  आपल्या कार्यालयाची दारे जनतेसाठी कायम उघडी असतील, असे स्पष्ट करीत जनतेने त्यांच्या कामासाठी चांगल्या सूचना मोकळेपणाने कराव्यात, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. 

पाच वर्षांत औरंगाबाद औद्योगिक हब होईल -चिरंजीव प्रसाद औरंगाबाद शहरातील जनता खूप चांगली आहे. यामुळे पाच वर्षांत औरंगाबाद औद्योगिक हब  म्हणून ओळखले जाईल, अशी प्रतिक्रिया मावळते पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. येथील पोलीस उपायुक्त खाटमोडे यांनी पाहिजे असलेली आणि फरारी आरोपी शोधण्यासाठी उत्तम योजना विकसित केली.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस