शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बाजरीस उच्चांकी २४७५ रुपये प्रती क्विंटलचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:29 IST

आवक घटल्याने  बाजरीने मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज झालेल्या लिलावात बाजरीला उच्चांकी भाव मिळाला. खाडेगाव (कचनेर ) येथील शेतकरी भरत हुल्सार यांच्या बाजरीची २४७५ रु प्रती क्विंटल अशा भावाने खरेदी करण्यात आली. 

आवक घटल्याने  बाजरीने मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे. जाधववाडी येथे मागील आठवड्यात परराज्यातील बाजरीला विक्रमी भाव मिळाला होता. विशेषत: उत्तर प्रदेश व राजस्थानमधून येणाऱ्या बाजरीला २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. हा भाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा जास्त आहे. आज या उच्चांकी भावालासुद्धा मात देत स्थानिक बाजरीने २४७५ रुपयांचा पल्ला गाठला आहे. 

आजवरचा सर्वात जास्त भाव भरत हुल्सार यांनी त्यांच्या एक एकर शेतीत बाजरी लावली होती. यातून त्यांना २१ गोण्या इतके बाजरीचे उत्पादन मिळाले. बाजरीला कमी पाणी लागत असल्याने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्येही बाजरीचे उत्पादन चागंले आहे. बाजरीस मिळालेला हा भाव आजवरचा सर्वात जास्त असल्याचे हुल्सार यांनी सांगितले. 

स्थानिक बाजरीला मागणी पावसाने ओढ दिल्याने बाजरीची वाढ खुंटली, तसेच राज्यात अनेक भागांत पिके जळाली. काही ठिकाणी बाजरीवर बुरशीअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्क्यापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. औरंगाबादेत उत्तर प्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होते, मात्र ही बाजरी बारीक व कमी प्रमाणात हिरवी असते, या उलट स्थानिक बाजरी मोठी व हिरवी असते यामुळे या बाजरीला मागणी असते अशी माहिती जाधववाडीतील व्यापारी गजानन बाळकृष्ण यांनी दिली. 

हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला  पूर्वी बाजरी ही गरिबांची समजली जायची. आता विशेषत: हिवाळ्यात गव्हापेक्षा बाजरी व ज्वारी खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे आता केंद्र सरकारने ज्वारी व बाजरीचा पोषक तृणधान्यामध्ये समावेश केला आहे, तसेच ज्वारीच्या हमीभावात ७३० रुपयांनी वाढ करून २४५० रुपये, तर बाजरीच्या हमीभावात ५२५ वाढ करून १९५० रुपये प्रतिक्विंटल केला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड