शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

औरंगाबाद शहरात येणारी जड वाहने रोखण्यासाठी पोलिसांचे ‘संरक्षक कडे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 7:21 PM

‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी   प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले. तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाई

औरंगाबाद : ‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी   प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नो एन्ट्रीमध्ये एकही जड वाहन आणि खाजगी बस शहरात  प्रवेश करणार  नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशित केले. यानंतर वाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले. 

याविषयी मिळालेली माहिती अशी की, गत सप्ताहात शहरात तीन वाहन अपघातात चार जणांचे बळी गेले. यात दोन अपघात जड वाहनांमुळे, तर तिसरा अपघात खाजगी बसमुळे झाला होता. जड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी एका अधिसूचनेद्वारे सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत नो एन्ट्री जाहीर केली. शिवाय लक्झरी बसेसनाही सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत नो एन्ट्री दुस-या अधिसूचनेनुसार करण्यात आली. असे असताना शहरात जड वाहने सुसाट घुसखोरी करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाहतूक विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. याविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आता सर्व प्रकारची जड वाहने दिवसभर आम्ही शहराबाहेर ठेवणार आहोत. सध्या जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेश दिला जातो. आता या वाहनांना प्रवेश न देण्याविषयी प्रशासन विचार करीत आहे. 

आता प्रवेशद्वारावर अडविणार जड वाहनेशहराच्या प्रवेशदारातच जड वाहने अडविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, अशी माहिती सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक एच.व्ही. गिरमे यांनी दिली. ते म्हणाले की, बीड बायपास रोडवरील देवळाई चौकातून शिवाजीनगरमार्गे शहरात येणारी वाहने देवळाई चौकात तर झाल्टा फाटा, सावंगी वळण रस्ता आणि जालन्याकडून येणारी वाहने केम्ब्रिज शाळा चौक, शिवाय चिकलठाणा येथील जुन्या वळण रस्त्यावरही वाहने रोखण्यात येत आहेत. वाहनांचा शहरातील प्रवेश रोखण्यासाठी केम्ब्रिज चौकात दोन, देवळाई चौकात तीन, हर्सूल टी-पॉइंट येथे दोन आणि चिकलठाणा जुना वळण रस्ता येथे एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नियुक्त असेल. वाहतूक पोलिसांसोबत संबंंधित ठाण्याच्या कर्मचाºयांची मदत घेण्यात आली आहे.

तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाईनियम तोडून शहरात आलेल्या ४२ जड वाहने आणि खाजगी बसेसवर प्रत्येकी बाराशे रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी दिली. या वाहनचालकांकडून ६१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.