शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 18:26 IST

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला

- संजय जाधव

पैठण: जायकवाडी धरणातून सिंचनासाठी यंदा ३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग डाव्या व उजव्या कालव्यातून करण्यात आला असून नियमित सर्व आवर्तने सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. १ जून २०२३ रोजी जायकवाडी धरणात ३७.२२% जलसाठा शिल्लक असून गतवर्षी आजच्या तारखेला धरणात ३८.३५% जलसाठा होता. यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तब्बल ९.७४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. एकंदरीत १ जून २०२२ ते १ जून २०२३ या जलवर्षात जलसाठ्यातून ५४.३६ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणातून तब्बल ११३ दिवस विसर्ग सुरू होता. या कालावधीत २०९ टीएमसी   धरण दोन वेळेस भरेल ईतक्या पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला होता. जायकवाडी प्रशासनाने योग्य नियोजन करून पुरपरिस्थिती टाळून शेवटच्या टप्प्यात धरण १००% भरून ठेवले होते. यामुळे धरणावर अवलंबून असलेला औद्योगिक क्षेत्रासहीत पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेती सिंचन, उपसा योजनांना नियमितपणे पाणी पुरवठा केल्यानंतरही १ जून रोजी धरणात १५४६.०२२ दलघमी ( ५४.१९ टीएमसी) जलसाठा शिल्लक राहिला आहे.  

१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन....कमी खोलीचा व  उथळ असा विस्तीर्ण पानपसारा लाभल्याने नाथसागराच्या जलाशयात खोलवर सुर्य किरणे पोहचतात ; यामुळे   बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पाकडे पाहिले जाते. यंदा  तापमानात वाढ झाल्याने १ जून पर्यंत २७६.९०५ दलघमी (९.७४ टीएमसी ) पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेले हे सर्वाधिक बाष्पीभवन आहे. निळवंडे प्रकल्पाची क्षमता ११ टीएमसी ऐवढी आहे यावरून बाष्पीभवनाने धरणातून किती पाण्याचा अपव्यय होतो याची तीव्रता समोर येते.

पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला लागते केवळ चार टीएमसी....१०२ टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातील जलसाठ्याची औद्योगिक क्षेत्र व पिण्याचा पाणीपुरवठा होणाऱ्या जनतेला मोठी काळजी असते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही क्षेत्राला केवळ ४ टीएमसी पाणी लागते. यंदा १ जून अखेर दोन्ही क्षेत्रास मिळून ९७.४४ दलघमी ( ३.४४ टीएमसी) पाण्याचा पुरवठा धरणातून करण्यात आला तर विविध उपसा जलसिंचन योजनांनी ७.७९ टीएमसी जलसाठा ओढल्याचे  धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

पुर नियंत्रण कक्ष सुरु १ जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होते. यामुळे गुरूवारी धरणावर पुर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून जबादाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पूर्ण हंगाम होईपर्यंत २४ तास दक्ष राहून नियंत्रण कक्षात पाणलोट क्षेत्रातील व धरणाच्या नोंदी घेण्यात येतात. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरूवारी सूचना व मार्गदर्शन केले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी