शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
3
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
4
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
5
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
6
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
7
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
8
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
9
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
10
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
11
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
12
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
13
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
14
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
15
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
16
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
17
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
18
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
19
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
20
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 18:26 IST

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला

- संजय जाधव

पैठण: जायकवाडी धरणातून सिंचनासाठी यंदा ३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग डाव्या व उजव्या कालव्यातून करण्यात आला असून नियमित सर्व आवर्तने सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. १ जून २०२३ रोजी जायकवाडी धरणात ३७.२२% जलसाठा शिल्लक असून गतवर्षी आजच्या तारखेला धरणात ३८.३५% जलसाठा होता. यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तब्बल ९.७४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. एकंदरीत १ जून २०२२ ते १ जून २०२३ या जलवर्षात जलसाठ्यातून ५४.३६ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणातून तब्बल ११३ दिवस विसर्ग सुरू होता. या कालावधीत २०९ टीएमसी   धरण दोन वेळेस भरेल ईतक्या पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला होता. जायकवाडी प्रशासनाने योग्य नियोजन करून पुरपरिस्थिती टाळून शेवटच्या टप्प्यात धरण १००% भरून ठेवले होते. यामुळे धरणावर अवलंबून असलेला औद्योगिक क्षेत्रासहीत पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेती सिंचन, उपसा योजनांना नियमितपणे पाणी पुरवठा केल्यानंतरही १ जून रोजी धरणात १५४६.०२२ दलघमी ( ५४.१९ टीएमसी) जलसाठा शिल्लक राहिला आहे.  

१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन....कमी खोलीचा व  उथळ असा विस्तीर्ण पानपसारा लाभल्याने नाथसागराच्या जलाशयात खोलवर सुर्य किरणे पोहचतात ; यामुळे   बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पाकडे पाहिले जाते. यंदा  तापमानात वाढ झाल्याने १ जून पर्यंत २७६.९०५ दलघमी (९.७४ टीएमसी ) पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेले हे सर्वाधिक बाष्पीभवन आहे. निळवंडे प्रकल्पाची क्षमता ११ टीएमसी ऐवढी आहे यावरून बाष्पीभवनाने धरणातून किती पाण्याचा अपव्यय होतो याची तीव्रता समोर येते.

पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला लागते केवळ चार टीएमसी....१०२ टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातील जलसाठ्याची औद्योगिक क्षेत्र व पिण्याचा पाणीपुरवठा होणाऱ्या जनतेला मोठी काळजी असते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही क्षेत्राला केवळ ४ टीएमसी पाणी लागते. यंदा १ जून अखेर दोन्ही क्षेत्रास मिळून ९७.४४ दलघमी ( ३.४४ टीएमसी) पाण्याचा पुरवठा धरणातून करण्यात आला तर विविध उपसा जलसिंचन योजनांनी ७.७९ टीएमसी जलसाठा ओढल्याचे  धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

पुर नियंत्रण कक्ष सुरु १ जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होते. यामुळे गुरूवारी धरणावर पुर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून जबादाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पूर्ण हंगाम होईपर्यंत २४ तास दक्ष राहून नियंत्रण कक्षात पाणलोट क्षेत्रातील व धरणाच्या नोंदी घेण्यात येतात. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरूवारी सूचना व मार्गदर्शन केले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी