शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल

By विजय सरवदे | Updated: January 14, 2023 20:08 IST

‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता.

नामांतर लढ्याला प्रेरणादायी इतिहास आहे. दलित पँथरसह अनेक पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते हा लढा नेटाने रेटून नेत होते. दुसऱ्या बाजूने विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून नामांतराला कडाडून विरोध करीत होते. या लढ्यात मराठवाड्यातील दलितांची हजारो घरे बेचिराख झाली, अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांचे स्मरण आणि तब्बल १७ वर्षे चाललेल्या या लढ्याचा विजयोत्सव म्हणून दरवर्षी दि. १४ जानेवारीला विद्यापीठ नामविस्तार वर्धापन उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मान्यवरांच्या काही आठवणी...

क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल प्रा. प्रकाश सिरसाट सांगतात, ‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता. औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात असलेल्या वसंत भुवन सभागृहात नामांतरवादी विद्यार्थी नागरिक कृती समितीच्या वतीने २२ जुलै १९७९ रोजी नामांतर परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत महाराष्ट्रातील नामांतरवाद्यांनी आपापल्या ठिकाणाहून पायी निघून औरंगाबादला यावे व दि. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतिचौकात सत्याग्रह करावा, असा कार्यक्रम घोषित करण्यात आला. यालाच ‘लाँग मार्च’ असे नाव देण्यात आले. नामांतर वादी कृती समितीचा भाग म्हणून याच्या प्रचाराची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती. इतरत्र बरेच फिरून झाले होते. 

शेवटचा दौरा म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी मी येवल्याच्या गेलो. तिथे राष्ट्र सेवा दलाच्या मोठा गट सक्रिय होता. सायंकाळी त्यांची बैठक सुरू झाली. माझा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली. संघटनेच्या भूमिकेच्या विरोध जाऊन त्यांनी सत्याग्रहात सहभागी होण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवसी सकाळीच औरंगाबादला जाण्यासाठी बस होती. तिने निघायचे ठरले. सकाळी बसस्टँडला पोहोचलो, बस उभीच होती. आत पाहिले तर बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. ड्रायव्हर, कंडक्टरही नव्हते. मनात शंका उद्भवली. ही बस एवढी रिकामी कधीच नसे. विचार करायला वेळ मिळावा म्हणून मुतारीकडे गेलो. आजूबाजूला साध्या वेशातील दोन पोलिस असल्याचे जाणवले. त्यातला एक तर औरंगाबादपासून मागावर असावा. इतरांना बसमध्ये चढू नका असे सांगावे म्हणून निघालो, तोपर्यंत निम्म्याहून अधिक कार्यकर्ते जागा पकडून बसले होते. मी बसजवळ जाईपर्यंत सगळेच आत बसलेले होते. तिथून निघावे, तर पळ काढला अशी कार्यकर्त्यांची समजूत व्हायची आणि थांबलो तर पोलिस पकडणार आणि आपण सत्याग्रहाला मुकणार अशा विचारात थांबायचे ठरवले. 

क्षणात पोलिसांनी बस ताब्यात घेतली आणि औरंगाबाद ऐवजी आमचा प्रवास येवला पोलिस स्टेशनच्या दिशेने सुरू झाला. दुपारपर्यंत लिखापढी पूर्ण करून आम्हाला पोलिस व्हॅनमध्ये बसवले. कुठे नेतायेत ते कळत नव्हते. आमच्यासोबत नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेले काही लहान मुले आणि मुली होत्या. त्या रडू लागल्या. शेवटी सायंकाळच्या सुमारास आम्ही नाशकात पोहोचलो. आमची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. अशारीतीने पोलिसांच्या नकली बसच्या जाळ्यात आम्ही सहज सापडलो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण