शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:07 IST

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद

ठळक मुद्देमहापालिकेच्या निवडणुकीत युती होणे अशक्य काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाशिवआघाडी सत्तेत आल्यास औरंगाबाद महापालिकेतही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीतही महाशिवआघाडी निवडणुकीला सामोरे जाईल. या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला महापालिकेत कधी नव्हे ते आता ‘अच्छे दिन’येण्याची शक्यता आहे. भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन तिन्ही पक्षांचे इच्छुक चांगलेच कामाला लागले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रथमच प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रभाग पद्धतीत आजपर्यंत ज्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यात आली तेथे भाजपला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. त्यामुळे औरंगाबादेतही प्रभाग पद्धतच असावी यावर भाजपचा सर्वाधिक भर आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे सध्या प्रभाग पद्धतीचे कामही सुरू आहे. २१ नोव्हेंबर रोजी प्रभाग पद्धतीचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त अशा तीन सदस्यांच्या समितीसमोर जाईल. डिसेंबरअखेरीस आरक्षणासाठी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांच्या सहकार्याने बहुमताचा आकडा महापालिकेत गाठता येऊ शकतो. महापालिकेत ११५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ५८ नगरसेवक लागतात. मागील ३४ वर्षांपासून महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. प्रत्येक महापौर, उपमहापौर निवडणुकीत युतीला अपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. युतीला औरंगाबादकरांनी कधीच स्पष्ट बहुमत दिले नाही. प्रभाग पद्धतीत होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष निवडून येण्याची शक्यता कमी आहे. 

महाशिवआघाडीला फायदाप्रभाग पद्धतीत महाशिवआघाडीला जास्त फायदा होईल, असा अंदाज आहे. अनेक प्रभागांमध्ये या तिन्ही पक्षांचा मुकाबला फक्त भाजपसोबत राहील. मुस्लिमबहुल भागात एमआयएमसोबत मुकाबला करावा लागले. प्रभाग पद्धतीत तीन हिंदुबहुल भागाला एक मुस्लिमबहुल भाग  आल्यास महाशिवआघाडीची सत्ता एकहाती येऊ शकते. काही प्रभागांमध्ये असे समीकरणही जुळत असल्याचे कळते.

महापालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना    - २९भाजप    - २३एमआयएम    - २३काँग्रेस    - १२अपक्ष    - १८बीएसपी    - ०४राष्ट्रवादी    - ०४रिपाइं (डी)    - ०२एकूण    - ११५

महाशिवआघाडी होऊ शकतेसध्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाशिवआघाडी करण्यासंदर्भात विचार होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन ही निवडणूक लढविल्या जाऊ शकते.- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र