शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:07 IST

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद

ठळक मुद्देमहापालिकेच्या निवडणुकीत युती होणे अशक्य काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाशिवआघाडी सत्तेत आल्यास औरंगाबाद महापालिकेतही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीतही महाशिवआघाडी निवडणुकीला सामोरे जाईल. या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला महापालिकेत कधी नव्हे ते आता ‘अच्छे दिन’येण्याची शक्यता आहे. भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन तिन्ही पक्षांचे इच्छुक चांगलेच कामाला लागले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रथमच प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रभाग पद्धतीत आजपर्यंत ज्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यात आली तेथे भाजपला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. त्यामुळे औरंगाबादेतही प्रभाग पद्धतच असावी यावर भाजपचा सर्वाधिक भर आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे सध्या प्रभाग पद्धतीचे कामही सुरू आहे. २१ नोव्हेंबर रोजी प्रभाग पद्धतीचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त अशा तीन सदस्यांच्या समितीसमोर जाईल. डिसेंबरअखेरीस आरक्षणासाठी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांच्या सहकार्याने बहुमताचा आकडा महापालिकेत गाठता येऊ शकतो. महापालिकेत ११५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ५८ नगरसेवक लागतात. मागील ३४ वर्षांपासून महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. प्रत्येक महापौर, उपमहापौर निवडणुकीत युतीला अपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. युतीला औरंगाबादकरांनी कधीच स्पष्ट बहुमत दिले नाही. प्रभाग पद्धतीत होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष निवडून येण्याची शक्यता कमी आहे. 

महाशिवआघाडीला फायदाप्रभाग पद्धतीत महाशिवआघाडीला जास्त फायदा होईल, असा अंदाज आहे. अनेक प्रभागांमध्ये या तिन्ही पक्षांचा मुकाबला फक्त भाजपसोबत राहील. मुस्लिमबहुल भागात एमआयएमसोबत मुकाबला करावा लागले. प्रभाग पद्धतीत तीन हिंदुबहुल भागाला एक मुस्लिमबहुल भाग  आल्यास महाशिवआघाडीची सत्ता एकहाती येऊ शकते. काही प्रभागांमध्ये असे समीकरणही जुळत असल्याचे कळते.

महापालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना    - २९भाजप    - २३एमआयएम    - २३काँग्रेस    - १२अपक्ष    - १८बीएसपी    - ०४राष्ट्रवादी    - ०४रिपाइं (डी)    - ०२एकूण    - ११५

महाशिवआघाडी होऊ शकतेसध्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाशिवआघाडी करण्यासंदर्भात विचार होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन ही निवडणूक लढविल्या जाऊ शकते.- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र