शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

छत्रपती संभाजीनगरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दिशेने; दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन

By मुजीब देवणीकर | Updated: February 29, 2024 18:06 IST

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडियाने मनपाला दिला अहवाल

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत आहे. मागील दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन झाल्याचा अभ्यास महापालिकेने नियुक्त केलेल्या ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडिया’ या संस्थेने केला आहे. कार्बन उत्सर्जनाचे हे प्रमाण चिंतेत टाकणारे असून, आतापासूनच व्यापक उपाययोजना करणे खूप गरजेचे असल्याचे संस्थेने महापालिकेला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

शहराचा पहिला वातावरणीय बदल कृती आराखडा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडिया’ या संस्थेने तयार केला. डिसेंबर, २०२१ मध्ये महापालिकेने संबंधित संस्थेसोबत करार केला होता. संस्थेने जानेवारी, २०२२ मध्ये कामाला सुरुवात केली. आराखडा तयार करण्यासाठी संस्थेला दोन वर्षांचा अवधी लागला. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महापालिकेने कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी नाल्यांवर व्हर्टिकल गार्डन तयार केले. हे उपाय फारसे प्रभावी ठरत नसल्याचे निदर्शनास आले.

खासगी वाहनांचा वापर वाढलाशहरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढू लागले. हे रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. स्मार्ट सिटीच्या शहर बस सुरू आहेत, पण त्या डिझेलवर चालणाऱ्या आहेत. सीएनजी किंवा ई-बसचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जास्त असावा, असे अहवालात नमूद आहे.

हरित पट्टे, ऑक्सिजन हबकाँक्रीटीकरणामुळे तापमानात वाढ होतेय. लोकसंख्या वाढू लागली. त्या तुलनेत वृक्षारोपणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हरित पट्टे, ऑक्सिजन हब ठिकठिकाणी तयार करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या बाजूने, दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करावे, असेही आराखड्यात म्हटले आहे. भारतीय प्रजातींची किंवा मराठवाड्यात आढळणारी, वाढणारी झाडे लावण्याचे काम पालिकेने प्राधान्याने करावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका