शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

छत्रपती संभाजीनगरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दिशेने; दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन

By मुजीब देवणीकर | Updated: February 29, 2024 18:06 IST

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडियाने मनपाला दिला अहवाल

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत आहे. मागील दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन झाल्याचा अभ्यास महापालिकेने नियुक्त केलेल्या ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडिया’ या संस्थेने केला आहे. कार्बन उत्सर्जनाचे हे प्रमाण चिंतेत टाकणारे असून, आतापासूनच व्यापक उपाययोजना करणे खूप गरजेचे असल्याचे संस्थेने महापालिकेला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

शहराचा पहिला वातावरणीय बदल कृती आराखडा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडिया’ या संस्थेने तयार केला. डिसेंबर, २०२१ मध्ये महापालिकेने संबंधित संस्थेसोबत करार केला होता. संस्थेने जानेवारी, २०२२ मध्ये कामाला सुरुवात केली. आराखडा तयार करण्यासाठी संस्थेला दोन वर्षांचा अवधी लागला. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महापालिकेने कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी नाल्यांवर व्हर्टिकल गार्डन तयार केले. हे उपाय फारसे प्रभावी ठरत नसल्याचे निदर्शनास आले.

खासगी वाहनांचा वापर वाढलाशहरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढू लागले. हे रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. स्मार्ट सिटीच्या शहर बस सुरू आहेत, पण त्या डिझेलवर चालणाऱ्या आहेत. सीएनजी किंवा ई-बसचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जास्त असावा, असे अहवालात नमूद आहे.

हरित पट्टे, ऑक्सिजन हबकाँक्रीटीकरणामुळे तापमानात वाढ होतेय. लोकसंख्या वाढू लागली. त्या तुलनेत वृक्षारोपणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हरित पट्टे, ऑक्सिजन हब ठिकठिकाणी तयार करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या बाजूने, दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करावे, असेही आराखड्यात म्हटले आहे. भारतीय प्रजातींची किंवा मराठवाड्यात आढळणारी, वाढणारी झाडे लावण्याचे काम पालिकेने प्राधान्याने करावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका