शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

नानांच्या नाराजीमागे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती ...

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षा डोणगावकर : आतापर्यंत शासनाकडून किती निधी आणला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती केवळ राजकीय द्वेषातूनच नाराजी व्यक्त केली, असा आरोप जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी केला आहे.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये एकदाही आक्रमक पवित्रा घेतला नाही. वर्षभरापूर्वी आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. याची कल्पना नानांना आहे. तरीही त्यांनी काल जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. गेल्या २९ वर्षांमध्ये कोल्हापुरी बंधाºयांचे गेट चोरीस गेले आहेत. काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे नव्याने गेट बसवून बंधाºयांमध्ये पाणी अडविण्यासाठी गेल्या वर्षी आपण निविदा प्रक्रिया सुरू केली. १७ जुलै २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत गेट खरेदीसंबंधी दराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव चर्चेला ठेवला. तेव्हा सभागृहाने सदरचा प्रस्ताव फेटाळला. यापूर्वी अशा प्रकारचा प्रस्ताव एकदाही सभागृहात सादर करण्यात आलेला नव्हता.जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाºयांना गेट खरेदीसाठी ६ कोटी ५५ लाख २३ हजार रुपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये सातत्याने मागणी के ल्यानंतरही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात गेट खरेदीसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची उपकरात तरतूद करण्यात आली आहे. याची निविदा प्रक्रिया कामनिहाय महिनाभरातच पूर्ण केली जाईल. विधानसभा अध्यक्षांनी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा शासनाकडून यासाठी चार वर्षांत एक छदामही उपलब्ध करून दिलेला नाही. याउलट ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेला, बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हा परिषदेला, तर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. ही जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे बागडे हे कदाचित शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नसावेत, असे सांगून डोणगावकर म्हणाल्या की, बागडे हे संपूर्ण जिल्ह्याचे नेते आहेत, असे असताना त्यांचा आग्रह सातत्याने केवळ फुलंब्री तालुक्यापुरताच असतो, हे योग्य वाटत नाही.त्यांचे ‘टार्गेट’ शिवसेनाजिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर हरिभाऊ बागडे यांनी काल जोरदार हल्लाबोल केला. ही बाब जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या फारच जिव्हारी लागली.नाना हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मनात आणले असते, तर चार वर्षांत शासनाचा मोठा निधी जिल्हा परिषदेला मिळवून दिला असता; पण शिवसेनेच्या ताब्यात जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांनी निधी तर आणलाच नाही, उलट या जिल्हा परिषदेला ‘टार्गेट’ केले आहे, असा आरोप जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेDevyani Patil Dongavakarदेवयानी पाटील डोणगावकर