शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
8
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
10
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
17
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
18
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
19
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
Daily Top 2Weekly Top 5

नानांच्या नाराजीमागे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती ...

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षा डोणगावकर : आतापर्यंत शासनाकडून किती निधी आणला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती केवळ राजकीय द्वेषातूनच नाराजी व्यक्त केली, असा आरोप जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी केला आहे.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये एकदाही आक्रमक पवित्रा घेतला नाही. वर्षभरापूर्वी आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. याची कल्पना नानांना आहे. तरीही त्यांनी काल जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. गेल्या २९ वर्षांमध्ये कोल्हापुरी बंधाºयांचे गेट चोरीस गेले आहेत. काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे नव्याने गेट बसवून बंधाºयांमध्ये पाणी अडविण्यासाठी गेल्या वर्षी आपण निविदा प्रक्रिया सुरू केली. १७ जुलै २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत गेट खरेदीसंबंधी दराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव चर्चेला ठेवला. तेव्हा सभागृहाने सदरचा प्रस्ताव फेटाळला. यापूर्वी अशा प्रकारचा प्रस्ताव एकदाही सभागृहात सादर करण्यात आलेला नव्हता.जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाºयांना गेट खरेदीसाठी ६ कोटी ५५ लाख २३ हजार रुपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये सातत्याने मागणी के ल्यानंतरही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात गेट खरेदीसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची उपकरात तरतूद करण्यात आली आहे. याची निविदा प्रक्रिया कामनिहाय महिनाभरातच पूर्ण केली जाईल. विधानसभा अध्यक्षांनी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा शासनाकडून यासाठी चार वर्षांत एक छदामही उपलब्ध करून दिलेला नाही. याउलट ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेला, बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हा परिषदेला, तर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. ही जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे बागडे हे कदाचित शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नसावेत, असे सांगून डोणगावकर म्हणाल्या की, बागडे हे संपूर्ण जिल्ह्याचे नेते आहेत, असे असताना त्यांचा आग्रह सातत्याने केवळ फुलंब्री तालुक्यापुरताच असतो, हे योग्य वाटत नाही.त्यांचे ‘टार्गेट’ शिवसेनाजिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर हरिभाऊ बागडे यांनी काल जोरदार हल्लाबोल केला. ही बाब जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या फारच जिव्हारी लागली.नाना हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मनात आणले असते, तर चार वर्षांत शासनाचा मोठा निधी जिल्हा परिषदेला मिळवून दिला असता; पण शिवसेनेच्या ताब्यात जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांनी निधी तर आणलाच नाही, उलट या जिल्हा परिषदेला ‘टार्गेट’ केले आहे, असा आरोप जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेDevyani Patil Dongavakarदेवयानी पाटील डोणगावकर