शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

औरंगाबाद ग्रामीणची बायोमेट्रीक पद्धतीने प्रथमच पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:18 IST

ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली.

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली. पोलीस भरतीत डमी उमेदवार बसविण्यास वाव असू नये, यासाठी या भरतीत बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेवर ईन कॅमेरा होत असून २१ व्हिडिओग्राफर प्रत्येक क्षण टिपत आहे.

पोलीस अधीक्षक डॉॅ. आरती सिंह यांनी या भरती प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या अस्थापनेसाठी पोलीस शिपायांची २० तर  कारागृह पोलीस शिपायांच्या ७६ अशा एकूण ९६पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ४६९ उमेदवारांनी सकाळी साडेपाच वाजता भरतीसाठी हजेरी लावली. उपस्थित उमेदवारांपैकी ३९४ जण मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. 

पोलीस भरती अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आल्याचे डॉ.सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, उमेदवारांना मैदानी चाचणी देताना त्यांना मिळणाºया गुणांमध्ये अचुकता असावी आणि डमी उमेदवारांना थारा मिळू नये,यासाठी प्रथमच भरतीसाठी येणाºया उमेदवारांची पडताळणी बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येत आहे. आर.एफ.आय.डी. पद्धतीद्वारे उमेदवारांचा धावण्याचा अचूक वेळ नोंदवून उमेदवारांना अचूक गुण दिले जाणार आहे. आधुनिक यंत्राचा वापर करून संपूर्ण पोलीस भरती ईन कॅमेरा होत आहे. याकरीता मैदानावर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण केले जात आहे. या भरतीदरम्यान उमेदवाराला शंका,आक्षेप असल्यास त्याचे लगेच निरसन वरिष्ठ अधिकारी करतील. या भरतीसाठी ४६ पोलीस अधिकारी आणि २०८पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. 

अमिषाला बळी पडू नकाअधीक्षक डॉ.आरती सिंह म्हणाल्या की, आजपासून सुरू झालेली पोलीस भरती अत्यंत पारदर्शक होत आहे. उमेदवारांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये, तसेच कोणी भरती करून देतो, असे प्रलोभन दाखवून पैशाची मागणी करत असेल किंवा वशिलेबाजीचा प्रयत्न करीत असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ आपल्याला द्यावी, अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा.   

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी