शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बीड, नेकनूरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:07 IST

पालकांचे समुपदेशन करून विवाह रोखण्यात यश  

बीड : मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण नसतानाच त्यांचे विवाह लावून दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ चाईल्ड लाईनच्या माध्यमातून धाव घेत नेकनूर व बीड शहरात अशा दोन ठिकाणचे बालविवाह रोखले. दोन्ही ठिकाणी मुलींच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना नोटीस बजावण्यात आली.

बीड तालुक्यातील नेकनूर येथे गुरूवारी दुपारी मोरगाव येथील १७ वर्षीय मुलीचा लातुर येथील २२ वर्षीय मुलासोबत विवाह होता. मुलीचे वय कमी असल्याची माहिती मिळताच नेकनूरचे सपोनि मनोज केदारे यांनी पोउपनि किशोर काळे यांनी विवाहस्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व खात्री करून मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांना नोटीस बजावून १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न लावणार नाही, असे लिहून घेतले. यावेळी पोह शरद कदम, दीपक खांडेकर, पवार आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

तर शुक्रवारी दुपारी दीड वाजता बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात बीडमधील १७ वर्षीय मुलीचा काळेगाव हवेली येथील २२ वर्षीय मुलासोबत विवाह होता. लग्नाला एक तासाचा अवधी असताच शिवाजीनगर ठाण्याचे पोनि शिवलाल  पुर्भे यांना ही माहिती मिळाली. त्यांनी विशेष शाखेचे आशिष वडमारे यांच्या मार्फत खात्री केली. खात्री पटताच पोलीस विवाहस्थळी दाखल झाले. पालकांना बोलावून घेत कायद्याची माहिती दिली. त्यांचे समुपदेशन करून नोटीस बजावण्यात आली. आशिष वडमारे, पोना गणेश परजणे, पोह रवी प्रधान, मपोशि सुवर्णा ढवळे यावेळी उपस्थित होते.

वऱ्हाडींची निराशादोन्ही ठिकाणचे विवाह थाटामाटात पार पडणार होते. सर्व तयारी झालेली होती. कोऱ्या कपड्यांमध्ये वऱ्हाडी मंडळी मंडपात दाखल झाली होती. अवघ्या काही मिनीटांवर मुहूर्त आले असताच पोलिसांनी जावून विवाह रोखला. त्यामुळे वऱ्हाडींची निराशा झाली. काही पाहुणे निराश होऊन घरी परतले तर काही जेवण करून गेले.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस