मद्यपी चालकांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 00:13 IST2016-04-24T00:06:24+5:302016-04-24T00:13:52+5:30

औरंगाबाद : वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवून पाच दिवसांत २८ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल के ला.

Police force to drink alcoholic drivers | मद्यपी चालकांना पोलिसांचा दणका

मद्यपी चालकांना पोलिसांचा दणका

औरंगाबाद : मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी व होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवून पाच दिवसांत २८ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल के ला.
मद्य सेवन करून, वाहन चालविणाऱ्यांना भविष्यात दंडाऐवजी हर्सूल कारागृहात पाठविण्याची विनंतीही न्यायालयाकडे करणार आहे. यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यप्राशन करणाऱ्या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याविषयी गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले की, मद्य सेवन करणाऱ्यांच्या विरोधात १२ महिने कारवाई केली जाते; परंतु अन्य कामांमुळे पोलिसांना वेळ मिळत नाही. त्यामुळे थर्टी फर्स्ट व धूलिवंदनालाच मद्यपींवर लक्ष ठेवले जाते; परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या दुर्घटना तसेच मद्यपींमुळे वाहतूक ठप्प यासह अन्य कारणांमुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मद्यपी वाहनचालकांना जरब बसण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून १८ ते २२ एप्रिलदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. रविवारपासून ही मोहीम अजून तीव्र करण्यात येणार आहे. दंडाऐवजी थेट हर्सूलला पाठविण्याच्या पोलिसांच्या प्रक्रियेमुळे मद्यपींमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Police force to drink alcoholic drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.