शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

तबलिगी जमातचा 'इज्तेमा' सोहळा होणार होता औरंगाबादेत; पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनर्थ टळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 10:56 IST

या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.

औरंगाबाद- देशात वादग्रस्त ठरलेला दिल्लीतील ‘तबलिगी जमात’चा (इज्तेमा) मेळावा सारखाच कार्यक्रम औरंगाबादमध्ये 27-28 आणि 29 मार्च रोजी होणारा होता. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द करण्याची हुशारी दाखविल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

तब्लीग इज्तेमा कमिटीने पत्रान्वये औरंगाबाद-पैठण रोडवरील गेवराई येथे पडीत पडलेल्या मैदानात मेळाव्याची परवानगी मागितली होती. परंतु कोरोनाचा राज्यातील अनेक भागात वाढता प्रसार पाहता या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नसल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आंधळे यांनी आयोजकांना कळविले.

या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करताना कार्यक्रमाची सर्व तयारी झाल्याने आपणास परवानगी मिळावी, अशी आयोजकांची विनंती पोलिसांनी लोकांच्या आरोग्याच्या पातळीवर फेटाळून लावली. कारण या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.

दिल्ली येथील कार्यक्रमाने संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. या कार्यक्रमामध्ये परदेशातील 18 मौलवींचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे शेकडो लोकांना या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वेळीच निर्णय घेत या कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमाला जवळपास 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्यासाठी मंडप आणि इतर तयारी सुद्धा करण्यात येत होती. कार्यक्रमात बयाण करण्यासाठी मालेगाव किंवा इतर जिल्ह्यातून कुणाला बोलवायचं याचा निर्णय झाला नव्हता. ते कमिटीच्या बैठकीत ठरणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ( हुसेन मौलाना ,व्यवस्थापक तब्लीग इज्तेमा कमिटी )