शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

तबलिगी जमातचा 'इज्तेमा' सोहळा होणार होता औरंगाबादेत; पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनर्थ टळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 10:56 IST

या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.

औरंगाबाद- देशात वादग्रस्त ठरलेला दिल्लीतील ‘तबलिगी जमात’चा (इज्तेमा) मेळावा सारखाच कार्यक्रम औरंगाबादमध्ये 27-28 आणि 29 मार्च रोजी होणारा होता. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द करण्याची हुशारी दाखविल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

तब्लीग इज्तेमा कमिटीने पत्रान्वये औरंगाबाद-पैठण रोडवरील गेवराई येथे पडीत पडलेल्या मैदानात मेळाव्याची परवानगी मागितली होती. परंतु कोरोनाचा राज्यातील अनेक भागात वाढता प्रसार पाहता या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नसल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आंधळे यांनी आयोजकांना कळविले.

या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करताना कार्यक्रमाची सर्व तयारी झाल्याने आपणास परवानगी मिळावी, अशी आयोजकांची विनंती पोलिसांनी लोकांच्या आरोग्याच्या पातळीवर फेटाळून लावली. कारण या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.

दिल्ली येथील कार्यक्रमाने संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. या कार्यक्रमामध्ये परदेशातील 18 मौलवींचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे शेकडो लोकांना या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वेळीच निर्णय घेत या कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमाला जवळपास 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्यासाठी मंडप आणि इतर तयारी सुद्धा करण्यात येत होती. कार्यक्रमात बयाण करण्यासाठी मालेगाव किंवा इतर जिल्ह्यातून कुणाला बोलवायचं याचा निर्णय झाला नव्हता. ते कमिटीच्या बैठकीत ठरणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ( हुसेन मौलाना ,व्यवस्थापक तब्लीग इज्तेमा कमिटी )