शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सुखद ! रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठाच्या बियाणांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 12:42 PM

३८ क्विंटलच्या आसपास बियाणे विक्री विभागीय कृषी विस्तार केंद्रातून झाली.

ठळक मुद्देरबीच्या पेरणीची लगबगबिल, बियाण्यांच्या पिशव्या संभाळून ठेवा

औरंगाबाद : रब्बी हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून, त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बियाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३८ क्विंटलच्या आसपास बियाणे विक्री विभागीय कृषी विस्तार केंद्रातून झाली. आता कोणतेच बियाणे शिल्लक उरलेले नाही.

गव्हाचे बियाणे उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली. तर पेरणीत शेजारच्या शेतकऱ्यांच्या अनुकरणापेक्षा उपलब्ध साधनसामुग्री, पाणी, शेतीचा पोत याचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यापीठाच्या हरबरा २० क्विंटल, ज्वारी ६.५ क्विंटल, करडी ६ क्विंटल, जवस दोन क्विंटल, काबुली हरबरा ३ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्याची पूर्ण विक्री झाली. रब्बी ज्वारी आठवडाभरात थंडी वाढण्यापूर्वी पेरणी संपवावी तर ३१ नोव्हेंबरपूर्वी बागायती हरबरा पेरणी संपायला हवी अशी शिफारस कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.  तर गव्हाची पेरणीही ३० नोव्हेंबरपूर्वी करण्याच्या सूचना देताना कापसाचे अतिवृष्टीत खूप नुकसान झाले. तरीही फरदडसाठी मेहनत वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या पिकाचा विचार करण्याचा सल्ला ठोंबरे यांनी दिला आहे.  रब्बीचे नॅशनल सीड काॅर्पोरेशन, कृषी विभागाकडूनही बियाण्यांची उपलब्धता असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिल, बियाण्यांच्या पिशव्या संभाळून ठेवापेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा, पेरणीतच खत पेरणीही गरजेची आहे. तर तणनाशकाचा वापर करतांना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घेऊन ते संभाळून ठेवा. तसेच पेरणीवेळी बियाण्यांच्या पिशव्या, लेबलही संभाळून ठेवण्याच्या सूचना कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ