शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

रक्षा विसर्जन करून ११ वृक्षांची केली लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:05 AM

अंभई : कोरोनाने दोन वर्षांत आपल्याला भरपूर शिकविले. ऑक्सिजनच्या तुटवड्याने अनेकांचा जीव गेला. याला मुख्य कारण म्हणजे झालेली जंगलतोड. ...

अंभई : कोरोनाने दोन वर्षांत आपल्याला भरपूर शिकविले. ऑक्सिजनच्या तुटवड्याने अनेकांचा जीव गेला. याला मुख्य कारण म्हणजे झालेली जंगलतोड. त्यामुळ‌े पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील पंडित परिवाराने पुढाकार घेतला. घरातील वृद्धाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रक्षा पाण्यात विसर्जन न करता घटांब्री शिवारात विसर्जन करून त्या ठिकाणी विविध जातींच्या ११ वृक्षांची लागवड करून संवर्धनाचा संकल्प केला.

घटांब्री येथील शामराव महादू पंडित यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम कोणत्याही धार्मिक स्थळावर न घेण्याचा निर्णय घेतला. शेतशिवारात रक्षाविसर्जन करून नारळ, पिंपळ, चिकू, पेरू, निंब, डाळिंब, उंबर अशा अकरा वृक्षांचे लागवड केले. यावेळी सुमित पंडित, प्रकाश पंडित, विष्णू पंडित, देविदास पंडित, भास्कर पंडित, कल्पेश पंडित, पुरुषोत्तम बोर्डे, शकुंतलाबाई पंडित, निर्मलाबाई बोर्डे, विमल पंडित, मीराबाई पंडित, लता पंडित,

रेणुका पंडित यांची उपस्थिती होती.

फोटो : वीरगाव शिवारात वृक्षारोपण करताना पंडित कुटुंबीय.

190621\sanjaykumar v. kadi_img-20210619-wa0097_1.jpg

वृक्षारोपण करताना पंडीत कुटुंबिय