नियोजन, सातत्यामुळे मिळाले यश
By Admin | Updated: June 18, 2014 01:40 IST2014-06-17T23:03:27+5:302014-06-18T01:40:49+5:30
शिरीष शिंदे , बीड दहावीचे वर्ष सुरु झाल्यानंतर चांगले मार्क्स घेऊन पास व्हायची ही मनोमन इच्छा होती. तशी मनाशी खुनगाठ बांधली होती.

नियोजन, सातत्यामुळे मिळाले यश
शिरीष शिंदे , बीड
दहावीचे वर्ष सुरु झाल्यानंतर चांगले मार्क्स घेऊन पास व्हायची ही मनोमन इच्छा होती. तशी मनाशी खुनगाठ बांधली होती. दहावीच्या अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन व त्यात सातत्य शेवटपर्यंत ठेवल्याने तिला ९७.२० टक्के गुण मिळाले. बीड येथील ज्योती सुग्रीव सवासे हिने आपल्या यशाचे रहस्य ‘लोकमत’शी बोलताना उलगडले.
ज्योती सुरवसे हि मुळची पाटोदा तालुक्यातील रहिवासी आहे.तिचे वडील सुग्रीव निवृत्ती सवासे हे माजलगाव येथील पंचायत समिती कार्यालयात वरीष्ठ सहायक पदावर कार्यरत आहेत. दहावीच्या यशाबद्दल तिने आपला मागील एक वर्षाची आठवन सांगताना म्हणाली की, दहवीचे वर्ष असल्याने जीवनाला याच वळणावर कलाटणी मिळणार असल्याची जाण होती. त्याबद्दल आई-वडिलांसह शिक्षकांनी पुरेशी माहिती दिली. वर्ष सुरु झाल्यानंतर अभ्यासक्रमाची नियोजनबद्ध तयारी केली. दररोज सकाळी सहा वाजता उठणे, परीक्षा किंवा चाचणी परीक्षा असताना चार वाजता अभ्यास करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली होती. शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा होती. शाळा सुटल्यानंतर दोन ते सहा पर्यत शिकवणी चालायची. घरी आल्यानंतर थोडासा विश्राम घेऊन सात ते साडे आठ व नऊ ते दहा या वेळेत अभ्यास करायचे. किचकट विषयांचा अभ्यास रात्री कधीच नाही केला. मॅथ व इंग्लिशसाठी सकाळचा वेळ दिला. विषयांचे नियोजन करण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने आखणी केली होती. मराठीसाठी नियमीत वाचन केले. इंग्रजी व संस्कृत विषयाच्या व्याकरणावर भर दिला. इतिहासमधील इसवी सन व नावे लक्षात ठेवण्यावर विशेष लक्ष दिले. मॅथ विषयासाठी टेक्निकवर भर दिला. विज्ञानाचे कन्सेप्ट समजवून घेतले.
दहावीचे वर्ष असल्याने क्लास सुटल्यानंतर क्लासमध्ये शिकविलेल्या धड्याचे रिव्हीजन करायचे. त्यात जे काही समजले नाही ते दुसऱ्या दिवशी सरला विचाराये त्यामुळे डोळ्याखालून वारंवार विषयाची उजळणी झाली. अभ्यासाचे नियोजन केले होते. प्रत्येक विषयाची आणखी पहिल्यापासूनच केली होती. त्यामुळे परीक्षा देताना अडचणी आल्या नाहीत. नियोजनामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात विद्यार्थ्यांनी टाळाटाळ केल्यास परिक्षेत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पहिल्यापासूनच अभ्यास करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. पुढे डॉक्टर होण्याचा संकल्प ज्योतीने व्यक्त केला.