शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासही ‘हाऊसफुल’ं

By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता दिवाळीच्या सुट्यांनिमित्त गावी आणि पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता दिवाळीच्या सुट्यांनिमित्त गावी आणि पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन करण्यात आले आहे. शिवाय अनेकांचा प्रवासही सुरू झाला आहे. यामुळे विविध रेल्वेगाड्या, बसगाड्यांबरोबर मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या विमानांची आगामी दिवसांमधील बुकिंग फुल झाली आहे.निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या काही दिवसांत औरंगाबादहून बाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे वाहतूक सेवेला त्याचा फटका सहन करावा लागला; परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता दिवाळी सणाच्या सुट्यांमध्ये गावी जाण्याबरोबर लहान, मोठ्या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यासाठी नियोजन करण्याची लगबग सध्या सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी परिवारासोबत तसेच मित्रांबरोबर जाण्याचा कल दिसून येत आहे. सुट्यांमध्ये यंदा दक्षिण भारत, दिल्ली, अमृतसर, काश्मीर, वैष्णोदेवी, डेहराडून यासह अन्य ठिकाणी जाण्यास पसंती दिली जात आहे.औरंगाबादहून मुंबई, दिल्लीपर्यंतचा प्रवास विमानाने करून त्यानंतर या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या विमानांची आगामी काही दिवसांतील बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे २३ आॅक्टोबरनंतर दिवाळीत पर्यटनासाठी शहरवासीय मोठ्या संख्येने विविध ठिकाणी पर्यटनाला जातील. दिवस, फ्लाईटची वेळ आणि आसनव्यवस्थेनुसार तिकिटांच्या दरात बदल होत असल्याने ऐनवेळी प्रवास करताना अधिक पैसे मोजण्याची वेळ अनेक प्रवाशांवर येणार आहे.