शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

औरंगाबादची कन्या करणार ‘इंडिगो’च्या विमानाचे सारथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 5:17 PM

उद्यापासून इंडिगोचे मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी विमान

ठळक मुद्देपायलट कीर्ती राऊत यांची गगनभरारी६ हजार तासांचा अनुभव

औरंगाबाद : औरंगाबादहून ‘इंडिगो’कडून ५ फेब्रुवारीपासून मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे ‘इंडिगो’च्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचे सारथ्य मराठवाड्यातील पहिल्या महिला वैमानिक कमांडर कीर्ती राऊत करणार आहेत.

कीर्ती राऊत या औरंगाबादेतील सदाशिव राऊत आणि जिजाबाई राऊत यांच्या कन्या आहेत. लहानपणी ‘मला विमान उडवायचे’ असे म्हणणाऱ्या कीर्ती पुढे चालून खरोखरच वैमानिक झाल्या.  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दाखल झाल्या आणि स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली. कीर्ती राऊत यांचे वैमानिकाचे प्रशिक्षण डेहराडून, अहमदाबाद आणि फ्रान्स येथे झालेले आहे. त्या २००६ मध्ये किंगफिशर एअरलाईनमध्ये को-पायलट म्हणून रुजू झाल्या. वयाच्या अवघ्या २२ वर्षी वैमानिक होण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले होते. त्यानंतर एप्रिल २०१२ मध्ये त्या इंडिगो एअरलाईनमध्ये रुजू झाल्या. तेथे कमांडरची अंतर्गत परीक्षा पास झाल्या. सध्या त्या कमांडर म्हणून काम करीत आहेत. 

इंडिगोकडून एखाद्या शहरासाठी पहिल्यांदाच नवीन विमान सुरू केले जात असेल, तर त्या विमानाचे सारथ्य करण्याची संबंधित शहरातील पायलटला संधी दिली जाते. औरंगाबादहून बुधवारपासून इंडिगोची मुंबई, दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरूहोत आहे. या तिन्ही मार्गांवर १८० आसनी एअरबसद्वारे ही सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचे सारथ्य करण्याची संधी कीर्ती राऊत यांना मिळाली आहे. ही बाब मराठवाड्यासाठी मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे. 

६ हजार तासांचा अनुभवकीर्ती राऊत यांना तब्बल ६ हजार तास विमान चालविण्याचा अनुभव आहे. अनेक दिवसांपासून मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवेची प्रतीक्षा केली जात होती. ही प्रतीक्षाही आता संपणार आहे. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर तब्बल १० महिन्यांनंतर मुंबईसाठी सकाळच्या वेळेत इंडिगोच्या माध्यमातून नियमित विमानसेवा सुरू होत आहे. 

मोठी संधी मिळालीइंडिगोकडून पहिल्यांदाच औरंगाबादहून विमानसेवा सुरूकेली जात आहे. मुंबई-औरंगाबाद-मुंबई या पहिल्या विमानाचे सारथ्य करण्याची मी विनंती केली. औरंगाबादची कन्या असल्याने संधी दिली पाहिजे, म्हणून वरिष्ठांनी तात्काळ मंजुरी दिली. ही संधी मोठी वाटते.- कीर्ती राऊत, कमांडर, इंडिगो एअरलाईन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpilotवैमानिकtourismपर्यटन