शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:10 IST

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी हा महत्त्वाचा घटक असून, पक्षघात अथवा पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला कबुतरांचे मांस व रक्ताने मालिश आणि इंजेक्शन घेतल्याने फरक पडतो, या अंधविश्वासातूनही कबुतरांचा बळी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कबुतरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ग्रामीण भागात याच पारव्याचा पक्षघात -लकवा-पॅरालिसिस या आजारावर उपचारासाठी अघोरी पद्धतीने सर्रास वापर केला जातो. रानटी कबुतराचे रक्त व मांस गरम प्रकृतीचे असते. त्यामुळे लकवा बरा करण्यासाठी पारव्यांचा जीव घेतला जात आहे. या कबुतरांच्या पायातील जुगुलर व्हेनमधून रक्त काढले जाते व ते गोठण्याच्या आतच ते लकवा झालेल्या व्यक्तीच्या कमरेत स्नायूमध्ये इंजेक्शनने टोचले जाते. अवघ्या २ मिनिटांच्या आतच या पक्षाचे रक्त गोठते. त्यामुळे तत्सम वैदू व उपचारकर्ते घाईतच ते टोचतात. त्यातून अनेकदा गुंतागुंत ही उद्भवते. यास वैद्यकशास्त्रीय असा कुठलाही आधार नाही. बऱ्याच जणांना या रक्ताची ॲलर्जी ही होते. सोबत या पक्ष्याचे मांसही लकवाग्रस्त व्यक्तीस खाऊ घालतात तर याचे रक्त काढून लकवा झालेल्या भागात चोळले जाते. असे हे पक्षी अनेक कामी मारले जातात. रक्त वाळल्यावर अंगात ताठरपणा जाणवतो व हाच फायदा काहीजण समजतात. ही जंगली कबुतरे, मासे पकडण्याचे जाळे लावून पकडली जातात. विशेषतः विहिरीमध्ये ती अधिवास करतात. रात्री ती विहिरीत निवांत पडलेली असताना विहिरीवर जाळे टाकून, आवाज करून त्यांना पकडले जाते.

रक्ताचा अंगठीतील खड्यासाठी उपयोगकबुतराचे रक्त वाळल्यावर दगडासारखे टणक बनते व या वाळलेल्या रक्ताच्या खड्यांपासून पिजण रुबी जेम्स नावाचे रत्न (खडे) बनवले जातात. हे रत्न अंगठीमध्ये परिधान करणे भाग्यशाली समजले जाते, मात्र अनेक जंगली कबुतरे याकामी नाहक मारली जात आहेत.

ही तर अंधश्रद्धापक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अंधश्रद्धेपोटी अनेक पक्ष्यांची शिकार होत आहे. अभिनव प्रतिष्ठानमार्फत आम्ही याबाबत जनजागृती करीत आहोत. आजपर्यंत शिकाऱ्याच्या तावडीतून अनेक पक्षी सोडविले आहेत. याकडे वनविभागाने लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनीही लकव्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत, विनाकारण पक्ष्यांचा बळी घेऊ नये.- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक, सिल्लोड

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगल