शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:10 IST

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी हा महत्त्वाचा घटक असून, पक्षघात अथवा पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला कबुतरांचे मांस व रक्ताने मालिश आणि इंजेक्शन घेतल्याने फरक पडतो, या अंधविश्वासातूनही कबुतरांचा बळी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कबुतरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ग्रामीण भागात याच पारव्याचा पक्षघात -लकवा-पॅरालिसिस या आजारावर उपचारासाठी अघोरी पद्धतीने सर्रास वापर केला जातो. रानटी कबुतराचे रक्त व मांस गरम प्रकृतीचे असते. त्यामुळे लकवा बरा करण्यासाठी पारव्यांचा जीव घेतला जात आहे. या कबुतरांच्या पायातील जुगुलर व्हेनमधून रक्त काढले जाते व ते गोठण्याच्या आतच ते लकवा झालेल्या व्यक्तीच्या कमरेत स्नायूमध्ये इंजेक्शनने टोचले जाते. अवघ्या २ मिनिटांच्या आतच या पक्षाचे रक्त गोठते. त्यामुळे तत्सम वैदू व उपचारकर्ते घाईतच ते टोचतात. त्यातून अनेकदा गुंतागुंत ही उद्भवते. यास वैद्यकशास्त्रीय असा कुठलाही आधार नाही. बऱ्याच जणांना या रक्ताची ॲलर्जी ही होते. सोबत या पक्ष्याचे मांसही लकवाग्रस्त व्यक्तीस खाऊ घालतात तर याचे रक्त काढून लकवा झालेल्या भागात चोळले जाते. असे हे पक्षी अनेक कामी मारले जातात. रक्त वाळल्यावर अंगात ताठरपणा जाणवतो व हाच फायदा काहीजण समजतात. ही जंगली कबुतरे, मासे पकडण्याचे जाळे लावून पकडली जातात. विशेषतः विहिरीमध्ये ती अधिवास करतात. रात्री ती विहिरीत निवांत पडलेली असताना विहिरीवर जाळे टाकून, आवाज करून त्यांना पकडले जाते.

रक्ताचा अंगठीतील खड्यासाठी उपयोगकबुतराचे रक्त वाळल्यावर दगडासारखे टणक बनते व या वाळलेल्या रक्ताच्या खड्यांपासून पिजण रुबी जेम्स नावाचे रत्न (खडे) बनवले जातात. हे रत्न अंगठीमध्ये परिधान करणे भाग्यशाली समजले जाते, मात्र अनेक जंगली कबुतरे याकामी नाहक मारली जात आहेत.

ही तर अंधश्रद्धापक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अंधश्रद्धेपोटी अनेक पक्ष्यांची शिकार होत आहे. अभिनव प्रतिष्ठानमार्फत आम्ही याबाबत जनजागृती करीत आहोत. आजपर्यंत शिकाऱ्याच्या तावडीतून अनेक पक्षी सोडविले आहेत. याकडे वनविभागाने लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनीही लकव्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत, विनाकारण पक्ष्यांचा बळी घेऊ नये.- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक, सिल्लोड

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगल